राजुरा -
मोकाट जनावरांच्या कळपांमुळे शहराच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून वाहनचालकांचे जीव धोक्यात आले आहे. मोकाट जनावरांना पडकण्याची मोहीम मध्यंतरी मंदावली होती. त्यामुळे रस्त्यांवरील जनावरांमुळे वाहन चालकांसोबतच सामान्य माणूस मात्र त्रस्त झाला होता.
गेल्या अनेक दिवसांपासून पाळीव मोकाट जनावरांचा शहरात त्रास वाढला असताना या संदर्भात नागरिकांच्या तक्रारीही वाढल्या होत्या तरी कारवाई मात्र होताना दिसत नव्हती. शहरातील महामार्गावरील आणि वेगवेगळ्या वस्त्यांमधील रस्त्यांवर तर जणू काही ठिकाणी जनावरांचे साम्राज्य असल्यामुळे वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. त्या अनुषंगाने आज नपच्या ठेकेदाराने शहरात मोकाट फिरणाऱ्या २६ नग जनावरांची कोंडवाड्यात रवानगी केली.








टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.