Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: त्या सहा कामगारांना आठ दिवसाच्या आत मध्ये कामावर न घेतल्यास.......
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सुरज ठाकरे यांचा कंपनी प्रशासनाला कडकडीत इशारा धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - सन २०१९ मध्ये ए.सी.बी. इंडिया लिमिटेड पां...
  • सुरज ठाकरे यांचा कंपनी प्रशासनाला कडकडीत इशारा
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
सन २०१९ मध्ये ए.सी.बी. इंडिया लिमिटेड पांढरपोवनी (आर्यन कोल वॉशरिज) कंपनीने अंदाजन ३७ ते ४० कामगार कामावरून कमी केले होते. कमी केलेल्या कामगारांना परत कामावर सामावून घेण्याबाबत कंपनीने आश्वासन दिले होते. परंतु कंपनीने ६ कामगारांना जाणीवपूर्वक कामावर न घेता बाकी काढलेल्या सर्व कामगारांना परत कामावर सामावून घेऊन बाकी ६ कामगारांवर अन्याय केला. अखेर ६ कामगार आपल्या न्याय व हक्कासाठी दारोदार भटकून निराश झाल्यानंतर युवा स्वाभिमान पार्टी चे जिल्हाध्यक्ष सुरज ठाकरे यांच्याकडे न्याय मागण्यास आल्या नंतर सूरज ठाकरे यांनी कामगारांवर होत असलेल्या पिळवणूकी कडे गांभीर्याने लक्ष देत तात्काळ संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करून तथा दि. १४ जुलै २१ ला आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याशी भेटून त्यांनाही या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सांगितले व कंपनी प्रशासनाशी चर्चा करून या ६ कामगारांना परत कामावर घेण्यास सांगितले. सदर कामगार स्थानिक असून आपल्या हक्क व अधिकारांबाबत जागृत असल्याने  कंपनी जाणीवपूर्वक कामगारांना कामावर घेत घेत नव्हती. याच कंपनीमध्ये जय भवानी कामगार संघटनेची सण २००९ मध्ये संस्थापक अध्यक्ष सुरज ठाकरे यांची कामगार संघटना होती. त्यावेळी येथील सर्व कामगारांना ठाकरे यांनी आवाहन दिले होते की कामगारांवर कंपनी प्रशासनाकडून झालेला कुठलाही अन्याय जय भवानी कामगार संघटना खपवून घेणार नाही. म्हणून आज सुरज ठाकरे यांनी कंपनी प्रशासनाला निवेदनाद्वारे या ६ कामगारांना येत्या आठ दिवसाच्या आत कामावर न घेतल्यास परिणाम वाईट होतील असा इशारा दिला.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top