Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नैसर्गिक आपत्तीत व अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसान ग्रस्ताना तातडीने मदत द्या
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
माजी आमदार अँड संजय धोटे यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्र...
  • माजी आमदार अँड संजय धोटे यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी

विरेन्द्र पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
राजुरा -
चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा विधानसभा क्षेत्रातील  राजुरा,कोरपणा,गोडपिपरी व जिवती तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील ठिकाणी  नैसर्गिक आपत्ती व झालेल्या अतिवृष्टी पावसाने  बहुतांश नुकसान झाले आहे. अतिवृष्टी व विज पडून अनेकाची घरे कोसळली तसेच शेतकऱ्यांची जनावरे दगावली आहेत. या बाबतीत अजूनही मोहबदला मागील दोन वर्षापासून मिळालेला नाही.सद्यस्थितीत माहे जुलै महिन्यात दिनांक १९-७-२१ते २२ -७-२१ या कालावधीत पावसाने हजेरी लावत नुकसान केलेले आहे.
शेतकरी कष्टकरी वर्ग आधिच अतिवृष्टी,सततची नापिकी,कर्जबाजारीपणा ईत्यादी  कारणांमुळे हवालदिल झालेले असुन काही गावात विज पडून घरे जळाले आहे.तर अनेक गावात अतिवृष्टी ने घरे कोसळली आहेत.एवढेच नाही तर विजेमुळे शेतकरी व शेतकऱ्यांचे औताचे बैल मरण पावल्याने ऐन हंगामाचे दिवसात शेतकऱ्यांच्या कुटुंबापूढे मोठी आर्थिक वा ईतर समस्या निर्माण झाली आहे.
दिनांक २१जुलै २१ ते २२जुलै २२ या दोन दिवसात राजुरा विधानसभा क्षेत्रातील झालेल्या तालुक्यात अतिपावसाने अनेकाचे नुकसान झाले आहे.या पावसामुळे अनेकाचे घरात पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.काही ठिकाणी जनावरे वाहून सुध्दा घेल्याचा  घटणा घडल्या आहे.तसेच राजुरा तालुक्यातील एक व्यक्ती पाण्यात वाहून गेल्याची घटणा घडली असून यापरिस्थितीत त्वरित मदत करणे आवश्यक असुन,या संदर्भात तातडीने पंचनामे करून शासनाच्या माध्यमातून त्वरित आर्थिक नुकसान भरपाई द्यावीत अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व लोकलेखा समितीचे प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार याना निवेदनाद्वारे केलेली आहेत,तसेच सद्यस्थितीतील नैसर्गिक व अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसान संदर्भात मौका चौकशी करून त्वरित पंचनामे करण्यात यावे अशीही मागणी माजी आमदार अँड संजय धोटे यांनी केली.
बातम्या अधिक आहेत..... 
⭕ विरूर स्टे येथे पुरामुळे अडकून पडलेल्या दोन शेतकऱ्यांनी झाळावर काढली रात्र ⭕ चिंचाळा पूल वाहून गेल्याने डोंगरगाव भेंडला मार्ग बंद ⭕ राजुरा तालुक्यात अनेक घरांचे नुकसान ; शेकडो घरांची परस्थिती बिकट ⭕ शेतशिवरात पूर स्थिती निर्माण झाल्याने शेतपिकांचे अतोनात नुकसान ⭕ डोंगरगाव डम्प ओव्हरफ्लोव ◼️ वाचा सविस्तर..... 👇







About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top