बाधित आलेल्या 35 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 5, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर 4, भद्रावती 1, ब्रम्हपुरी 0 , नागभिड 0, सिंदेवाही 1, मूल 3, सावली 2, पोंभूर्णा 1, गोंडपिपरी 4, राजूरा 1, चिमूर 0, वरोरा 6, कोरपना 6, जिवती 0 व इतर ठिकाणच्या 1 रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 84 हजार 552 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 82 हजार 295 झाली आहे. सध्या 741 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 5 लाख 36 हजार 309 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 4 लाख 49 हजार 225 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1516 बाधितांचे मृत्यू झाले आहे.
प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.