- ५८ पॉझिटीव्ह तर ५ बाधितांचा मृत्यू
बाधित आलेल्या ५८ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील ४, चंद्रपूर तालुका ३, बल्लारपूर ५, भद्रावती १, ब्रम्हपुरी १, नागभिड ०, सिंदेवाही १, मूल २, सावली ०, पोंभूर्णा ४, गोंडपिपरी ०, राजूरा २, चिमूर ०, वरोरा ३, कोरपना १२, जिवती ० व इतर ठिकाणच्या २० रुग्णांचा समावेश आहे.
आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील बालाजी वार्ड येथील ७५ वर्षीय महिला, ४२ वर्षीय महिला, बल्लारपूर तालुक्यातील राजेंद्र प्रसाद वार्ड येथील ७२ वर्षीय पुरुष, वरोरा तालुक्यातील आंबेडकर वार्ड येथील ४९ वर्षीय पुरुष तर गडचिरोली जिल्हयातील आरमोरी येथील ४५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८४ हजार ३०१ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८१ हजार ९९७ झाली आहे. सध्या ७९७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५ लाख २२ हजार २५६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ४ लाख ३४ हजार ८९३ नमुने निगेटीव्ह आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत १५०७ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील १३९३, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली ४२, यवतमाळ ५२, भंडारा ११, वर्धा एक, गोंदिया तीन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे.
प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच ४५ वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.