Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: दिलासादायक ; चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात 1133 झाले कोरोनामुक्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
21 बाधीतांचा मृत्यू ; 1618 नव्याने बाधित वाचा सविस्तर.... श्रावण कुमार - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - जिल्ह्यात मागील 24 तासात 1133 जणां...

  • 21 बाधीतांचा मृत्यू ; 1618 नव्याने बाधित
  • वाचा सविस्तर....
श्रावण कुमार - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
जिल्ह्यात मागील 24 तासात 1133 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1618 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 21 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 51 हजार 112 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 35 हजार 712 झाली आहे. सध्या 14 हजार 646 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 53 हजार 72 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 2 लाख 95 हजार 807 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील 45 व 39 वर्षीय पुरुष, भिवापुर येथील 67 वर्षीय महिला, गोपाल पुरी येथील 61 वर्षीय पुरुष, घुगुस येथील 60 वर्षीय पुरुष. मूल तालुक्यातील 38 व 53 वर्षीय पुरुष. वरोरा तालुक्यातील 58 व 78 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, सरदार पटेल वार्ड येथील 64 वर्षीय महिला. गोंडपिपरी तालुक्यातील 52 वर्षीय पुरुष. ब्रह्मपुरी येथील 65 वर्षीय महिला .नागभीड तालुक्‍यातील 55 वर्षीय पुरुष, चिमूर तालुक्यातील 43 वर्षीय महिला 65‌ व 70 वर्षीय, सावरगाव येथील 36 वर्षीय पुरुष. लाखांदूर येथील 65 वर्षीय महिला.बल्लारपूर येथील 80 वर्षीय पुरुष.भद्रावती येथील 72 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 754 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 696, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 25, यवतमाळ 22, भंडारा सहा, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1618 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 587, चंद्रपूर तालुका 140, बल्लारपूर 101, भद्रावती 100, ब्रम्हपुरी 106, नागभिड 77, सिंदेवाही 19, मूल 30, सावली 32, पोंभूर्णा 37, गोंडपिपरी 12, राजूरा 36, चिमूर 50, वरोरा 172, कोरपना 89, जिवती 16 व इतर ठिकाणच्या 14 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. 





Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top