Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नागपुरात पेट्रोलपंप सायंकाळी सात वाजेपर्यंतच
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
संग्रहित छायाचित्र आयशा - आमचा विदर्भ प्रतिनिधी नागपूर - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर 'ब्रेक द चेन' अंतर्गत राज्य सरकारने अत्...

संग्रहित छायाचित्र

आयशा - आमचा विदर्भ प्रतिनिधी
नागपूर -
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर 'ब्रेक द चेन' अंतर्गत राज्य सरकारने अत्यावश्यक सेवांमध्ये मोडणारी किराणा, भाजीपाला दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत ठेवण्याचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर शहरातील पेट्रोलपंप सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचा निर्णय विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिशनने जाहीर केला आहे. यामुळे रस्त्यावर विनाकाम फिरणाऱ्यांची गर्दी आणखी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

शहरात दररोज सहा ते आठ हजारांच्या संख्येने नवे कोरोना बाधित आढळत आहेत. यामुळे कठोर लॉकडाउन लावण्यात आला. यामध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ या वेळेतच सुरू आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे असाच काहीसा निर्णय पेट्रोलपंप संघटनेने घेतला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर पेट्रोलपंपवर काम करणारे कर्मचारी संसर्गाच्या भीतीने कामावर येण्यास तयार नाहीत. त्यातच सध्या लॉकडाउन सुरू असल्याने व कर्मचाऱ्यांची काळजी म्हणून सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत पंप सुरू ठेवण्याचा निर्णय असोसिएशनचे घेतला असल्याचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आपातकालीन वाहतूक सेवांवर याचा कुठलाही परिणाम होऊ नये यासाठी तेल कंपन्यांतर्फे संचालित पंप सुरू राहतील.

शहरात जवळपास ८५ पेट्रोलपंप असून तेल कंपन्या आणि पोलिस प्रशासनातर्फे चालविण्यात येणारे १० पेट्रोल पंप आहेत. पेट्रोलपंप संघटनेच्या या निर्णयामुळे याचा परिणाम रस्त्यावरील गर्दी कमी होण्यास होऊ शकतो. विशेष म्हणजे लॉकडाउनला सुरुवात झाल्यानंतर पेट्रोल व डिझेलच्या विक्रीमध्ये ६५ टक्यांची घट झाली असल्याचेही गुप्ता यांनी यावेळी सांगितले. लॉकडाउनमुळे खासगी कार्यालये, महाविद्यालये, शाळा बंद आहेत. तर सरकारी कार्यालयांमध्येही केवळ १५ टक्के उपस्थितीचा नियम असल्याने एकूणच पेट्रोल व डिझेलचा वापर कमी झाल्याचे पुढे आले आहे. 







About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top