नेर (यवतमाळ) -
पूजा चव्हाण या तरुणीच्या कथित आत्महत्या प्रकरणात अडकलेले संजय राठोड यांच्या मतदारसंघातील 415 लोकसंख्या असलेल्या कापसी गावाला अद्यापही ग्रामपंचायतीचा दर्जा मिळाला नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील कापसी ह्या गावाला अद्याप पर्यंत ग्रामपंचायत नाही याला जबाबदार कोण ? असे खडे बोल हि आता लोक एकमुखाने विचारात आहे. नेर तालुक्यातील कापसी या गावाला ग्रामपंचायत नसल्यामुळे गावकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. गावकऱ्यांनी वारंवार जिल्हा परिषदेला ग्राम पंचायती साठी ठराव दिला तरी सुद्धा ग्राम पंचायतीचा प्रश्न निकाली लागला नाही. गावामध्ये येणारा रस्ता खराब झाला आहे. विजेच्या खांबावरील लाईट, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. परिणामी गावकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रशासनाने शीघ्रतेने ग्राम पंचायतीचा प्रलंबित प्रश्न निकाली काढवा लागावा, अन्यथा कोरोनाचा पादुर्भाव कमी झाल्यानंतर जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा गावातील युवक-युवतींनी दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.