- शेतकऱ्यांना बसला आर्थिक फटका
नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या लागवडीचा खर्चही भरून निघाला नाही. यातच करोनाचे संकट वाढल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे. तेलवर्गीय पिकांना अधिक भाग मिळणार म्हणून शेतकऱ्यांनी कर्ज काढून पेरण्या केल्या. पिकही बहरून आले. पण, यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील भूईमुगाच्या पिकाला शेंगाच लागल्या नाही. यासाठी कृषी विद्यापीठांची निष्क्रियता मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याचा आरोपही मोघे यांनी केला आहे. हरितक्रांतीचे प्रणेते राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी राज्यात मोठ्या संख्येने कृषी विद्यापीठांची स्थापना केली. या विद्यापीठांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी सतत संशोधन होईल, असा विश्वास व्यक्त केला होता. आजही शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे मारल्या जात असल्याचा आरोपही मोघे यांनी केला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.