Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात 1064 झाले कोरोनामुक्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
29 बाधीतांचा मृत्यू ; 1741 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर आजची आकडेवारी ; वाचा सविस्तर.... श्रावण कुमार - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर ...

  • 29 बाधीतांचा मृत्यू ; 1741 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर
  • आजची आकडेवारी ; वाचा सविस्तर....

श्रावण कुमार - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
दि. 29 एप्रिल : जिल्ह्यात मागील 24 तासात 1064 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1741 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 29 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 58 हजार 645 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 41 हजार 408 झाली आहे. सध्या 16 हजार 360 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 73 हजार 004 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 3 लाख 9 हजार 565 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील नगीनाबाग येथील 63 वर्षीय पुरुष, 53,60 व 68 वर्षीय पुरुष, लालपेठ कॉलनी परिसरातील 50 वर्षीय पुरुष, बाबुपेठ येथील 45,55 व 67 वर्षीय महिला, रामनगर परिसरातील 55 वर्षीय महिला, अरविंद नगर येथील 84 वर्षीय महिला, सरकार नगर येथील 50 वर्षीय पुरुष, वरोरा तालुक्यातील 68 वर्षीय पुरुष, वायगाव येथील 60 वर्षीय पुरुष, 70 व 87 वर्षीय पुरुष, बल्लारपूर तालुक्यातील 55 वर्षीय महिला, विसापूर येथील 60 वर्षीय महिला. 65 वर्षीय पुरुष, कोरपना तालुक्यातील 45 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील 50 ‌व 52 वर्षीय महिला, चिमूर तालुक्यातील 58 वर्षीय पुरुष, सरडपार येथील 65 वर्षीय महिला, आडेगाव येथील 43 वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील 49 व 57 वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील 68 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 877 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 812, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 27, यवतमाळ 25, भंडारा सात, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1741 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 497, चंद्रपूर तालुका 142, बल्लारपूर 104, भद्रावती 106, ब्रम्हपुरी 121, नागभिड 39, सिंदेवाही 116, मूल 123, सावली 39, पोंभूर्णा 11, गोंडपिपरी 45, राजूरा 98, चिमूर 50, वरोरा 128, कोरपना 87, जिवती 15 व इतर ठिकाणच्या 20 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top