- जिल्ह्यात 855 नव्याने पॉझेटिव्ह
- 1104 कोरोनामुक्त, 31 मृत्यू
गत 24 तासात जिल्ह्यात 855 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून 1104 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण 31 मृत्यु झाले. यातील 21 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, चार मृत्यु डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये तर सहा मृत्यु खाजगी रुग्णालयात झाले.
जि.प. आरोग्य विभागाच्यातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण 5546 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 855 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4691 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6831 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2524 तर गृह विलगीकरणात 4307 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 51850 झाली आहे. 24 तासात 1104 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 43776 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1243 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.60 असून मृत्युदर 2.40 आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 59, 50, 44, 74 वर्षीय पुरुष व 58 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष व 33 वर्षीय महिला, वणी येथील 72, 65, 55 वर्षीय महिला, तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष, नेर तालुक्यातील 65 वर्षीय पुरुष, पांढरकवडा तालुक्यातील 80 वर्षीय पुरुष व 54 वर्षीय महिला, आर्णि येथील 55 वर्षीय पुरुष, तालुक्यातील 42 वर्षीय पुरुष व 70 वर्षीय महिला, महागाव तालुक्यातील 75 वर्षीय महिला, कळंब येथील 61 वर्षीय महिला, बाभुळगाव तालुक्यातील 58 वर्षीय महिला आणि मारेगाव तालुक्यातील 60 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 47 वर्षीय पुरुष व 47 वर्षीय महिला, वणी येथील 46 वर्षीय पुरुष, दिग्रस येथील 80 वर्षीय महिला, आर्णि येथील 58 वर्षीय पुरुष आणि घाटंजी येथील 48 वर्षीय महिला आहे. तर डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये मृत झालेल्यांमध्ये पुसद तालुक्यातील 45 वर्षीय महिला, वणी येथील 65 वर्षीय पुरुष व 85 वर्षीय महिला आणि मारेगाव तालुक्यातील 48 वर्षीय पुरुष आहे.
गुरुवारी पॉझेटिव्ह आलेल्या 855 जणांमध्ये 542 पुरुष आणि 313 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 208 पॉझेटिव्ह रुग्ण, वणी 46, पांढरकवडा 129, घाटंजी 41, दारव्हा 128, उमरखेड 13, आर्णि 35, दिग्रस 50, पुसद 55, नेर 36, महागाव 14, मारेगाव 30, झरीजामणी 33, बाभुळगाव 5, राळेगाव 20, कळंब 6 आणि इतर शहरातील 6 रुग्ण आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 411544 नमुने पाठविले असून यापैकी 404767 प्राप्त तर 6777 अप्राप्त आहेत. तसेच 352917 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.