- डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना रात्र पाळीत शिकवण उजळणी
विरूर स्टेशन -
राजुरा तालुक्यात आदर्श व हागणदारी मुक्त गाव म्हणुन नावारूपास येत असलेल्या खैरगुडा या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या माध्यमातुन मागील अनेक दिवसापासुन विद्यार्थ्यांना रात्र पाळीत शिकवण उजळणी सुरु आहे. या शिकवण उजळणीला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. कोरोना मुळे मागील एक वर्षांपासून पहिली ते चौथी वर्गापर्यँतच्या शाळा पूर्णतः बंद आहेत. मुलांच्या शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असून शासनाने ठरवून दिलेल्या कोरोनाच्या मार्गदर्शक नियमावलीचे काटेकोरपणे पालन करत गावातील तरुणांनी वाचनालयाचाच्या माध्यमातुन रात्र पाळीत शिकवण उजळणी सुरु केली आहे. या रात्र पाळीतील शिकवण उजळणी वर्गाचे सर्वच स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.