- भारतीय जनता पार्टी जिल्हा नागपूर यांची मागणी
- सदर आदेश पत्राची होळी जिल्हाधिकारी कार्यालय समोर
तसेच दिनांक 30 सप्टेंबरच्या मंत्रीमंडळ बैठकीतही केन्द्र सरकारच्या कृषी कायदयाच्या अंमलबजावणी लांबणीवर टाकण्याच्या व केन्द्र सरकारच्या कृषी कायदयाला राज्यात स्थगीती देण्याच्या इरादयाने मंत्रीमंडळ उपसमीती नेमण्याचा व विवीध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
केवळ कृषी उत्पन्न बाजार समीती सभापतीच्या अपीलावर एकतर्फी निर्णय घेणे,दिनांक 24 जुन व 10 ऑगष्ट रेाजी केन्द्रीय कृषी कायदयाच्या स्वत:च काढलेल्या अंमलबजावणी आदेशाला स्थगीती देणे.मंत्रीमंडळ बैठकीतही जाणीव पुर्वक शेतकरी विरोधी निर्णय घेणे या सर्व घडामोडीवरुन राज्यातील आघाडी सरकार शेतकरी विरोधी असुन राज्य सरकारच्या निर्णयाचा नागपूर जिल्हा भारतीय जनता पार्टीने त्रिव्र शब्दात निषेध केला.
सबब, केन्द्र सरकारने संमत केलेल्या कृषी विषयक कायदयाच्या अंमलबजावणी ला स्थगीती देण्याचा सहकार मंत्री यांच्या आदेशाला त्वरीत रदद करुन मंत्रीमंडळातील ठरावही रदद करण्यात यावा व शेतकरी हितासाठी राज्यात त्वरीत नवीन कृषी कायदयाची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी नागपूर जिल्हा भारतीय जनता पार्टीची आहे. सदर आदेश पत्राची होळी जिल्हाधिकारी कार्यालया समोर श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे भाजपा प्रदेश महामंत्री,अरविंद गजभिये ग्रामीण जिल्हा अध्यक्ष यांचा नेतृत्वात करण्यात आली यावेळी उपस्थित खासदार डॉ.विकास महात्मे,आमदार गिरीश व्यास,आनंदराव राऊत, रमेश मानकर,किशोर रेवतकर,अविनाश खळतकर, ईमेश्वर यावलकर, अजय बोढारे,अनिल निधान,संदीप सरोदे,संध्याताई गोतमारे,विशाल भोसले,अंबादास उके,आदर्श पटले,दीपचंद शेंडे, कपिल आदमने,प्रमोद हत्ती इतर भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.