Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: मुरली सिमेंट कंपनी (दालमिया भारत) मध्ये जुन्या व स्थायी कामगारांना पूर्ववत स्वरूपात समाविष्ठ करण्यात यावे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
माजी आमदार एड.संजय धोटे यांच्या नेतृत्वात भारतीय सिमेंट मजदूर संघातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदनातून मागणी सुरज लेडांगे - प्रतिनिधी गडचांदू...

  • माजी आमदार एड.संजय धोटे यांच्या नेतृत्वात भारतीय सिमेंट मजदूर संघातर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदनातून मागणी
सुरज लेडांगे - प्रतिनिधी
गडचांदूर -
चंद्रपुर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात असलेली नारंडा येथील पूर्ववत सुरू झालेली मुरली सिमेंट कंपनी (दालमिया भारत) मध्ये जुन्या व स्थायी कामगारांना पूर्ववत त्याच स्वरूपात समाविष्ठ करावे, अशी मागणी भारतीय सिमेंट मजदूर संघातर्फे राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार एड. संजय धोटे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे करण्यात आली. यावेळी भारतीय मजदूर संघाचे जिल्हाध्यक्ष एड. शैलेश मुंजे, भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने, किशोर राहुल, अनिल बंडीवार यांचे तर्फे निवेदन सादर करण्यात आले.

मुरली सिमेंट कंपनी ही सन २०१५ मध्ये बंद झाली होती, त्यानंतर सन २०२० मध्ये कंपनी सुरू झाली असून, जेव्हा कंपनी बंद झाली तेव्हा स्थायी व कंत्राटी असे एकूण ९४७ कामगार होते. आता कंपनी पूर्ववत सुरु झाल्यावर सर्व कामगारांना पूर्ववत कंपनी मध्ये रोजगार मिळेल अशी आशा निर्माण झालेली आहे.

कंपनीत कार्यरत असलेले जुने ३०६ स्थायी कामगार व बाकी कंत्राटी कामगार होते, त्यांना पूर्ववत त्याच विभागात कामावर समाविष्ठ करून घ्यावे तसेच नवीन स्थानिक कामगारांनाच कामावर घेण्यात यावे अशी मागणी यावेळी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली.

सदर प्रकरणावर केंद्रीय साहाय्यक कामगार आयुक्त व कंपनी प्रशासन आणि भारतीय सिमेंट मजदूर संघ यांची संयुक्त बैठक लावून सदर विषयांवर सविस्तर चर्चा करून मार्ग काढू असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सांगितले. यावेळी भारतीय मजदूर सिमेंट संघातर्फे रामरूप कश्यप, सत्यवान चामाटे, राजू गोहणे, संजय चहानकर, अजय खामनकर, अजय तिखट उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top