Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सिमेवरील ती 14 गावे महाराष्ट्राचीच असुन महाराष्ट्राचीच राहणार - आमदार सुभाष धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी राजुरा - जिवती तालुक्यातील महाराष्ट्र तेलंगना सिमेवरील मौजे परमडोली, मकदमगुडा, लेंडीजाडा, शंकरलोधी, अंतापुर, ...

अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी
राजुरा -
जिवती तालुक्यातील महाराष्ट्र तेलंगना सिमेवरील मौजे परमडोली, मकदमगुडा, लेंडीजाडा, शंकरलोधी, अंतापुर, येसापुर, भोलापठार, तांडा, कोटा बु., महाराजगुडा, पदमावती, इंदिरानगर, पळसगुडा, व लेंडीपुरा या 14 गावांचा प्रश्न गेली अनेक वर्षापासुन प्रलंबित आहे. महाराष्ट्राच्या हद्दीतील 14 गावांबाबत तेलंगना वन विभागाकडून त्या १४ गावातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. याबाबत राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांची राज्याचे महसूल मंत्री मा. बाबासाहेब थोरात व महसुल विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर यांना तेलंगना वन विभागाकडून होत असलेली १४ गावातील मोजणी तातडीने थांबविण्याबाबतचे निवेदन दिले. 

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे दालनात बैठक आयोजीत करून त्या १४ गावांबाबत असलेली समस्या अवगत करून दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा व कोरपना या तालुक्याची पुनर्रचना करून जिवती तालुक्याची निर्मिती करण्यात आली त्यावेळेस या १४  गावांचे नावे महाराष्ट्र शासनाच्या  राजपत्रात उल्लेख आहे. याचाच अर्थ सदर गावे हि चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील असून महाराष्ट्राचीच आहे हि बाब वन विभागाच्या निदर्शनास आणून दिली. सन १९६९ मध्ये वन परिक्षेत्र वनसडी यांनी या १४ हि गावांना चराई करीता जागा दिलेली होती. 

हि गावे महाराष्ट्राच्या हद्दीत असुन वन विभागाने कोणत्याही परिस्थितीत आपला ताबा सोडू नये असे निर्देश मध्य चांदा वनविभाग चंद्रपूरचे उपवनसंरक्षक यांना दिले. या प्रसंगी बैठकीला चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, वनविभागाचे उपवनसंरक्षक अरविंद मुंडे, उपविभागीय अधिकारी जे. पि. लोंढे, उपविभागीय वनअधिकारी प्रितमशिंग कोडापे, जिवती वनपरिक्षेत्र अधिकारी कुमारी योगिता मडावी, जिवती तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष गणपत आडे, प्रा. सुग्रीव गोतावडे, मुकदमगुडाचे रामदास रणवीर आदी उपस्थितीत होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top