Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: निजामाच्या त्या संपत्तीचा लाभ राजुरा क्षेत्रातील मुलनिवासीना मिळावा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरा मुक्तीदिन समितीचे एसडीओ मार्फत पंतप्रधानांना निवेदन वैभव वैद्य - शहर प्रतिनिधी राजुरा - हैद्राबाद येथील सातव्या निजामाने सन 1948 मध्य...

  • राजुरा मुक्तीदिन समितीचे एसडीओ मार्फत पंतप्रधानांना निवेदन
वैभव वैद्य - शहर प्रतिनिधी
राजुरा -
हैद्राबाद येथील सातव्या निजामाने सन 1948 मध्ये इंग्लंड येथील बँकेत रक्कम जमा केली होती. या रक्कमेचा न्यायालयातील दावा आपल्या भारत देशाने जिंकला असून व्याजासह सुमारे 306 करोड रक्कम मिळणार आहे. निजामाच्या हैद्राबाद स्टेटची ही रक्कम असून त्याचा विनियोग व तत्कालीन निजाम स्टेट मध्ये असलेल्या राजुरा क्षेत्रातील आदिवासीच्या सर्वांगीण विकासासाठी व्हावा, अशी मागणी राजुरा मुक्तीदिन उत्सव समितीने राजुरा उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत पंतप्रधान ना. नरेंद्रजी मोदी यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. उद्या दिनांक १७ सप्टेंबर ला हैद्राबाद मुक्तीदिन असून त्यानिमित्त या मुक्तीसंग्रामाच्या पूर्वसंध्यला राजुरा मुक्तीदिन उत्सव समितीने ही मागणी केली आहे.

सन १९४८ मध्ये हैद्राबाद च्या निजामाच्या वित्तमंत्र्यांनी दहा लाख पाउंड एवढी रक्कम लंडनच्या बँकेत जमा केली होती. या रक्कमेवर भारत, पाकिस्तान व  निझामाच्या वारसदारांनी दावे केले होते. या खटल्याचा निकाल ऑक्टोम्बर २०१९ मध्ये भारत व निझामाच्या वारसदारांच्या बाजूने लागला आहे. यातून सरकारला ३०५ करोड रुपये मिळणार असून निजामाची ही रक्कम त्याकाळी याच भागातील लोकांच्या करातून मिळालेली आहे. म्हणून तत्कालीन निजामशाहीचा भाग असलेल्या अविकसित भागासाठी वापरणे हे न्यायोचित राहणार आहे. त्यावेळेचा राजुरा तालुका म्हणजे आताचा राजुरा, कोरपना व जिवती या तालुक्यांनी निझामाचा अन्याय सहन केला आहे. म्हणून या हैद्राबाद फंडावर राजुरा क्षेत्राचाही अधिकार आहे. 

केंद्र सरकारला मिळणाऱ्या या रक्कमेतून राजुरा तालुक्यातील आदिवासी, कोलाम, पारधी, गोलकर व अन्य मागास जाती व जमाती या विकासाचे प्रवाहापासून दूर राहिलेल्या जनतेचा सर्वांगीण विकास करावा आणि या भागात सुखसुविधा निर्माण कराव्यात, अशा मागणीचे निवेदन राजुरा मुक्तीदिन उत्सव समितीचे संयोजक अनिल बाळसराफ, सहसंयोजक मिलिंद गड्डमवार, दिलीप सदावर्ते, मिलिंद देशकर, गणेश बेले, सुरेश साळवे, रंगराव कुलसंगे, एड. मेघा धोटे, सुनयना तांबेकर, कल्याणी भांडारकर, पूर्वा खेरकर यांनी मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पाठविण्यासाठी राजुरा उपविभागीय अधिकारी जे. पी. लोंढे यांना दिले. यावेळी तहसीलदार डॉ. रवींद्र होळी हे प्रामुख्याने उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top