Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवावी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शेतकरी संघटनेची मागणी अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी राजुरा - कांद्याला जीवनावश्यक यादीतून वगळल्यानंतर आता त्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर...

  • शेतकरी संघटनेची मागणी
अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी
राजुरा -
कांद्याला जीवनावश्यक यादीतून वगळल्यानंतर आता त्या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होण्यापूर्वीच वाणिज्य मंत्रालयाने कांद्यावर निर्यातबंदी लादली आहे. यामुळे शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला असून केंद्र  सरकारने ही निर्यातबंदी तातडीने उठवावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.

आधीच कोरोनामुळे सर्व व्यापार कोलमडला असून सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी लपंडाव सुरू केला आहे. एका बाजूला सांगायचे की आम्ही व्यापार मोकळा केला आणि दुसऱ्या बाजूला मात्र बाजारात आणि परकीय बाजारात कांदा उत्पादकांना निर्यातीतून चार पैसे मिळण्याची व्यवस्था असताना केंद्र सरकारने ओठात एक आणि पोटात एक अशी भूमिका घेतली आहे. जीवनावश्यक वस्तू कायद्याच्या कचाट्यातून मोकळे करण्याकरता कांदा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळला,परंतु त्याच अध्यादेशातील आवश्यक तेव्हा निर्यातबंदी लावू, या तरतुदींचा अध्यादेशाचे रूपांतर कायद्यात व्हायच्या आधीच सरकारने वाणिज्य मंत्रालयामार्फत मा. ना. पियुष गोयल, केंद्रीय वाणिज्यमंत्री यांच्यामार्फत घोषणा करून कांद्यावर निर्यातबंदी लावली आहे. त्यामुळे कांदा निर्यातदार शेतकरी, निर्यातदार व्यापारी हे सर्व संकटात आले आहेत. ही निर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्यांच्या व्यापार स्वातंत्र्यावर घाला आहे. म्हणून महाराष्ट्र शेतकरी संघटना केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या या निर्णयाचा निषेध करते व शेतकऱ्यांची ढासळलेली आर्थिक स्थिती बघता तसेच कांदा निर्यातदार व व्यापारीही या धोरणामुळे आर्थिक संकटात असल्यामुळे केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी तात्काळ उठवावी व कांदा उत्पादक शेतकरी व  निर्यातदार यांना न्याय दयावा, अशी मागणी शेतकरी संघटनेने केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांना निवेदन पाठवून केली आहे.

ही निर्यात बंदी तातडीने  उठवावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार एड. वामनराव चटप, शेतकरी संघटनेचे प्रांताध्यक्ष अनिल घनवट, माजी आमदार सरोजताई काशीकर, माजी प्रांताध्यक्षा शैलाताई देशपांडे, राम नेवले, मधुकर हरणे,सतीश दाणी, मदन कांबळे, प्रभाकर दिवे, गीताताई खांडेभराड, सुधीर सातपुते, अरुण पाटील नवले, निळकंठराव कोरांगे, तुकेश वानोडे, डॉ. संजय लोहे, प्रा.जोत्स्ना मोहितकर, पौर्णिमा निरंजने, ऍड. श्रीनिवास मुसळे, प्रा. निळकंठ गौरकर, रमेश नळे, ऍड. शरद कारेकर, दादा नावलाखे, प्राचार्य अनिल ठाकुरवार, जगदीश नाना बोन्डे, ललित बहाळे, गुणवंत पाटील, सीमा नरोडे, संजय कोले यांनी केली आहे. 




About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top