Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: कोरपना येथे शासकीय विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय सुरू करा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
विद्यार्थी व पालकाची मागणी ; शैक्षणिक दृष्ट्या होतेय गैरसोय शैलेश कोरांगे - प्रतिनिधी कोरपना - तेलंगणा राज्य व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरील ...

  • विद्यार्थी व पालकाची मागणी ; शैक्षणिक दृष्ट्या होतेय गैरसोय
शैलेश कोरांगे - प्रतिनिधी
कोरपना -
तेलंगणा राज्य व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरील शेवटचे तालुका मुख्यालय असलेल्या कोरपना येथे शासकीय उच्च माध्यमिक, पदवी व पदव्युत्तर विज्ञान - वाणिज्य महाविद्यालय सुरू करण्यात यावे अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून होते आहे.

कोरपना या ठिकाणी विज्ञान व वाणिज्य विद्याशाखेचे उच्च माध्यमिक, पदवी व पदव्युत्तर महाविद्यालय नसल्याने कोरपना शहरासह परिसरातील १२० गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी इतरत्र ठिकाणी जावे लागत आहे. यात वेळ व आर्थिक बाब मोठ्या प्रमाणात खर्ची पडत असल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो आहे. कोरपना हे तालुक्याचे ठिकाण असल्याने या परिसरातील विद्यार्थी शिक्षणासाठी मोठ्या संख्येने येतात. परंतु येथे कला विद्याशाखा व्यतिरिक्त अन्य शाखांचे अभ्यासक्रमच उपलब्ध नाही.तसेच सद्यस्थितीत शासनाने नवीन महाविद्यालयांना अनुदान देणे बंद केल्यामुळे या विद्याशाखा येथे सुरू  करण्यास कुणीही पुढे येत नाही. त्यामुळे येथे शासनानेच विज्ञान व वाणिज्य विद्याशाखेचे उच्च माध्यमिक, पदवी व पदव्युत्तर महाविद्यालय सुरू केल्यास येथील विद्यार्थ्यांची गैरसोय ही दूर होईल. तसेच या आदिवासी बहुल, अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दृष्ट्या सर्वांगिन विकास साधला जाईल.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top