Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा जिवती येथे निरीक्षक नसल्याने शेतकरी दोन महिन्यापासून पिक कर्जपासून वंचित
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शेतकरी सावकाराच्या दारी : शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्ज वाटप करा श्रमिक एल्गार उपाध्यक्ष घनशाम मेश्राम यांची मागणी अनंता गोखरे - तालुका प्रतिन...

  • शेतकरी सावकाराच्या दारी : शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्ज वाटप करा
  • श्रमिक एल्गार उपाध्यक्ष घनशाम मेश्राम यांची मागणी
अनंता गोखरे - तालुका प्रतिनिधी
राजुरा -
जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा जिवती येथे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत असून शेतकरी दोन महिन्या अगोदर सातबारा व आवश्यक कागदपत्रे पिक कर्जासाठी बँकेकडे सादर केले आहेत अशी माहिती शेतकरी कोदू कुमारे यांनी दिली आहे. मात्र बँकेच्या नियोजन शून्य कामामुळे व निरीक्षक अभावी शेतकरी पीक कर्जापासून अनेक महिन्यांपासून वंचित आहेत. 

शेतकऱ्यांना शेतीकरण्यासाठी  नाईलाजास्तव सावकाराकडे पैशासाठी जावे लागत असल्याने शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत. सूत्रांच्या माहिती नुसार जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा जिवती चे शाखा व्यवस्थापक यांचे अपघात झाल्याने मागील दोन महिन्यांपासून त्याच शाखेतील निरीक्षकांना प्रभारी शाखा अधिकारी नेमण्यात आले आहे. यामुळे निरीक्षकांचे काम वेळीच होत नसल्याने शेतकऱ्यांना  पीक कर्ज देण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. प्रभारी शाखा अधिकारी यांची बदली झाल्याने नवनियुक्त शाखा अधिकारी आले आहेत मात्र निरीक्षकाचा प्रश्न जैसे थे आहे. 

शेतकरी पिक्कर्जासाठी जिवती येथे रोज चकरा मारत आहेत. यामुळे  त्यांना आर्थिक नुकसानही सहन करावा लागत आहे यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ पीककर्ज वाटप करावे अशी मागणी श्रमिक  एल्गार उपाध्यक्ष तथा आदिवासी न्याय हक्क परिषदेचे केंद्रीय संयोजक घनशाम मेश्राम यांनी केली आहे. 

शासनाचा व कोणत्याही नेत्याचा कुठलाही लक्ष नसल्याने शेतकऱ्यांना मागील दोन महिन्यांपासून पीककर्जापासून वंचित राहावे लागत आहे. असे शेतकरी बोलत आहेत. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा जिवती  येथील पीक कर्ज तत्काळ देण्यात यावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top