राज्यातील अनेक ग्रामपंचायतची मुदत संपली आहे. कोरोनामुळे सध्या ग्राम पंचायत निवडणूका होणे शक्य नसल्याने राज्य सरकारने निवडणुका सहा महिने पुढे धकळल्या आहेत. गावातील कारभार सुरळीत चालावा यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रशासक म्हणून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर केली आहे.
माजी सरपंच विलास बघिले यांनी हिरापुर ग्राम पंचायत पदाचा प्रभार संभाळला असून त्यांच्या काळात अनेक विकास कामे पूर्ण झालीत, त्यांनी अत्यंत कर्तव्यदक्षतेनी आपला प्रभार सांभाळला त्यामुळे ग्राम पंचायत पदाधिकारी यांनी त्यांचे स्वागत करत त्यांना निरोप देण्यात आला.
कृषी अधिकारी घनश्याम पसारे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच विलास बघिले, ग्रामसेवक किरण गायकवाड, मनोज सोगलकर, अतुल बावनकर, रोशन बावनकर, पिंटू बावनकर ग्रा.पं.शिपाई शंकर ढोक ई. उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.