Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: जनता कर्फ्यू लावताना महत्‍वपूर्ण उपाय योजना कराव्‍या - भाजपा महानगर शाखेची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिल्हाधिकारींना निवेदन दिले श्रावण कुमार - प्रतिनिधी  चंद्रपूर -  चंद्रपूर जिल्‍हयात जनता कर्फ्यू लावताना काही महत्‍वपूर्ण विषयांच्‍या अनुषं...

  • जिल्हाधिकारींना निवेदन दिले
श्रावण कुमार - प्रतिनिधी 
चंद्रपूर - 
चंद्रपूर जिल्‍हयात जनता कर्फ्यू लावताना काही महत्‍वपूर्ण विषयांच्‍या अनुषंगाने उपाययोजना करण्‍याची मागणी भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर शाखेतर्फे जिल्‍हाधिकारी अजय गुल्‍हाने यांच्‍याकडे करण्‍यात आली. यातील बहुतांश विषयांच्‍या अनुषंगाने उपाययोजना करण्‍याचे आश्‍वासन जिल्‍हाधिकारी अजय गुल्‍हाने यांनी दिले.

आज जिल्‍हाधिकारी कार्यालयात जनता कर्फ्यू च्‍या अनुषंगाने संपन्‍न झालेल्‍या बैठकीत महापौर राखी कंचर्लावार, भाजपा महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी मागणीचे एक निवेदन जिल्‍हाधिका-यांना सादर केले. भाजपाने केलेल्‍या मागण्‍यांमध्‍ये प्रामुख्‍याने जिल्‍हयातील डॉक्‍टर्स, परिचारीका, आरोग्‍य कर्मचारी यांची रिक्‍त पदे त्‍वरीत भरावी, रूग्‍णवाहीकांची कमतरता त्‍वरीत दूर करावी, ऑक्‍सीजन सिलेंडर्स, व्‍हेटीलेटर्स, रूग्‍णांसाठी बेड्स त्‍वरीत उपलब्‍ध करावे, आयसीयू मध्‍ये रूग्‍णांना जागा उपलब्‍ध होण्‍याच्‍या दृष्‍टीने उपाययोजना करावी, हातावर पोट घेवून जगणा-या गरीबांना रेशन धान्‍य, पॅकेज देण्‍याच्‍या दृष्‍टीने कार्यवाही करावी तसेच गरीबांच्‍या भोजनाची योग्‍य व्‍यवस्‍था करावी, जंतूनाशक फवारणी व सफाई मोहीमेसाठी जिल्‍हा नियोजन समितीच्‍या माध्‍यमातुन निधी उपलब्‍ध करावा, गरीबांपर्यंत किराणा व धान्‍याच्‍या किट्स पोहवाव्‍या, बॉर्डर सील कराव्‍या तसेच अवैध दारूविक्रीवर प्रतिबंध घालावा, मास्‍क अनीवार्य करावे, सार्वजनिक जागा सॅनिटाईज कराव्‍या, पीपीई किट्स उपलब्‍ध कराव्‍या, संजय गांधी निराधार योजना व सामाजिक अर्थसहाय्याच्‍या अन्‍य योजनांचे अनुदान त्‍वरीत द्यावे, खाजगी रूग्‍णालयांमध्‍ये तसेच इतर कोणत्‍याही ठिकाणी कोरोना चाचणीसाठी शुल्‍क आकारू नये, नागरिकांमध्‍ये जागृती निर्माण करण्‍याच्‍या दृष्‍टीने आकाशवाणी, समाज माध्‍यमांवर व्हिडीओंचे प्रसारण, प्रसिध्‍दी फलक आदींचा वापर करावा या मागण्‍या भाजपातर्फे करण्‍यात आल्‍या आहेत.



About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

  1. Bjp सरकार जब थी महाराष्ट्र में तब bjp ने सोने की बिस्किट बांटी थीं जैसे

    उत्तर द्याहटवा
  2. Bjp वाले विपक्ष में कुछ ज़्यादा ही एक्टिव हो जाते है
    सत्ता में कुम्भकर्ण से कम नही

    उत्तर द्याहटवा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top