- जिल्हाधिकारींना निवेदन दिले
आज जिल्हाधिकारी कार्यालयात जनता कर्फ्यू च्या अनुषंगाने संपन्न झालेल्या बैठकीत महापौर राखी कंचर्लावार, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी मागणीचे एक निवेदन जिल्हाधिका-यांना सादर केले. भाजपाने केलेल्या मागण्यांमध्ये प्रामुख्याने जिल्हयातील डॉक्टर्स, परिचारीका, आरोग्य कर्मचारी यांची रिक्त पदे त्वरीत भरावी, रूग्णवाहीकांची कमतरता त्वरीत दूर करावी, ऑक्सीजन सिलेंडर्स, व्हेटीलेटर्स, रूग्णांसाठी बेड्स त्वरीत उपलब्ध करावे, आयसीयू मध्ये रूग्णांना जागा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने उपाययोजना करावी, हातावर पोट घेवून जगणा-या गरीबांना रेशन धान्य, पॅकेज देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी तसेच गरीबांच्या भोजनाची योग्य व्यवस्था करावी, जंतूनाशक फवारणी व सफाई मोहीमेसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातुन निधी उपलब्ध करावा, गरीबांपर्यंत किराणा व धान्याच्या किट्स पोहवाव्या, बॉर्डर सील कराव्या तसेच अवैध दारूविक्रीवर प्रतिबंध घालावा, मास्क अनीवार्य करावे, सार्वजनिक जागा सॅनिटाईज कराव्या, पीपीई किट्स उपलब्ध कराव्या, संजय गांधी निराधार योजना व सामाजिक अर्थसहाय्याच्या अन्य योजनांचे अनुदान त्वरीत द्यावे, खाजगी रूग्णालयांमध्ये तसेच इतर कोणत्याही ठिकाणी कोरोना चाचणीसाठी शुल्क आकारू नये, नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने आकाशवाणी, समाज माध्यमांवर व्हिडीओंचे प्रसारण, प्रसिध्दी फलक आदींचा वापर करावा या मागण्या भाजपातर्फे करण्यात आल्या आहेत.



Bjp सरकार जब थी महाराष्ट्र में तब bjp ने सोने की बिस्किट बांटी थीं जैसे
उत्तर द्याहटवाBjp वाले विपक्ष में कुछ ज़्यादा ही एक्टिव हो जाते है
उत्तर द्याहटवासत्ता में कुम्भकर्ण से कम नही