Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: विरूर गावात सामाजिक क्रांतीची नांदी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
तीन आंतरजातीय विवाहांनी दिला समतेचा संदेश आमचा विदर्भ - अविनाश रामटेके विरूर स्टेशन (दि. २२ जानेवारी २०२६) -         राजुरा तालुक्यातील विरू...
तीन आंतरजातीय विवाहांनी दिला समतेचा संदेश
आमचा विदर्भ - अविनाश रामटेके
विरूर स्टेशन (दि. २२ जानेवारी २०२६) -
        राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन गावात लग्नसराईच्या सुरुवातीलाच तीन आंतरजातीय विवाह जुळल्याने सामाजिक परिवर्तनाचे सकारात्मक आणि आशादायी चित्र समोर आले आहे. परंपरागत विचारसरणीला छेद देत, समता आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या घडामोडीने संपूर्ण परिसरात चर्चा सुरू झाली आहे.

        या तीनही आंतरजातीय विवाहांचे वैशिष्ट्य म्हणजे हे विवाह कोणत्याही तणावाशिवाय, दोन्ही कुटुंबे आणि समाजघटकांच्या संमतीने रीतसर बैठक घेऊन आणि परंपरागत पद्धतीने निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे समाजात संघर्ष नव्हे तर समन्वय आणि परस्पर सन्मानाचा आदर्श निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

        या आंतरजातीय विवाहांमध्ये कुणबी समाजातील युवकाचा आदिवासी समाजातील युवतीशी विवाह, बौद्ध समाजातील युवकाचा कुणबी समाजातील युवतीशी विवाह, तसेच बंजारा समाजातील युवकाचा बौद्ध समाजातील युवतीशी विवाह जुळला आहे. येत्या काळात हे सर्व युवक-युवती विवाहबंधनात अडकणार असून, त्यांच्या निर्णयाला कुटुंबीयांसह समाजाचाही पाठिंबा लाभत आहे.

        पूर्वी ग्रामीण भागात जात, परंपरा आणि सामाजिक दबावामुळे अशा विवाहांना तीव्र विरोध होत असे. अनेक ठिकाणी तणाव, वाद आणि सामाजिक बहिष्काराच्या घटना घडत होत्या. मात्र विरूर गावात चित्र पूर्णतः वेगळे असून, येथे संवाद, चर्चा आणि सामंजस्याच्या माध्यमातून निर्णय घेतले जात आहेत, ही बाब सामाजिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

विरूर गाव आज जातिभेदाला छेद देणाऱ्या सामाजिक बदलाचे प्रतीक ठरत आहे. युवक-युवती जीवनसाथीची निवड करताना आता जात न पाहता विचार, शिक्षण, समज, संस्कार आणि परस्पर आपुलकीला प्राधान्य देत असल्याचे या घटनांमधून स्पष्ट होते. ही घडामोड केवळ तीन विवाहांपुरती मर्यादित नसून, समाजाच्या मानसिकतेत होत असलेल्या मोठ्या बदलाची नांदी मानली जात आहे. आंतरजातीय विवाहांमुळे समाजात समता, बंधुता आणि सामाजिक एकात्मता वाढीस लागते, तसेच येणाऱ्या पिढीसाठी हा एक सकारात्मक आणि प्रेरणादायी संदेश ठरत आहे.

        राजुरा तालुक्यातील विरूर हे गाव आज केवळ भौगोलिकदृष्ट्या नव्हे, तर सामाजिक विचारांनीही पुढारलेले गाव म्हणून ओळख निर्माण करत आहे. जातमुक्त आणि समताधिष्ठित समाजाच्या दिशेने टाकलेले हे ठोस पाऊल परिसरातील इतर गावांसाठीही आदर्श ठरणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

#InterCasteMarriage #SocialChange #EqualityInSociety #BreakingCasteBarriers #ProgressiveVillage #SocialRevolution #UnityInDiversity #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top