Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राजुरात काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा - सरकारविरुद्ध संतापाचा उद्रेक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
काँग्रेसने सादर केल्या २७ ठोस मागण्या; तहसीलदारांकडे निवेदन मोर्चात हजारोंची उपस्थिती, घोषणाबाजीने शहर दणाणले आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुर...
काँग्रेसने सादर केल्या २७ ठोस मागण्या; तहसीलदारांकडे निवेदन
मोर्चात हजारोंची उपस्थिती, घोषणाबाजीने शहर दणाणले
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. ०५ ऑक्टोबर २०२५) -
         शेतकरी, शेतमजूर, कामगार, सुशिक्षित बेरोजगार आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत काँग्रेसतर्फे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी सरकारवर तीव्र टीका करत “जनतेची फसवणूक करून सत्तेत आलेल्या महायुतीला आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे,” असे वक्तव्य केले. भवानी माता मंदिरापासून तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात हजारो शेतकरी, शेतमजूर आणि नागरिक सहभागी झाले. “शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा”, “शेतकरी एकता जिंदाबाद”, “फसव्या सरकारचा निषेध असो” अशा घोषणांनी राजुरा शहर दणाणून गेले.

        माजी आमदार सुभाष धोटे म्हणाले की, “चंद्रपूर जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार असूनही ओला दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नाही. मतचोरी करून सत्तेत आलेल्या अशा आमदारांची सदस्यता रद्द करावी. सरकारने शेतकरी आणि जनतेचे प्रश्न न सोडवल्यास जनआक्रोश उफाळून येईल.” खासदार प्रभाताई धानोरकर म्हणाल्या की, “केंद्र व राज्यातील सत्ताधारी पक्षांनी जनतेचा विश्वासघात केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून लक्ष विचलित करून दिशाभूल करण्याचे काम या सरकारने केले आहे.”
शासनाकडे २७ ठोस मागण्या
        मोर्चाच्या माध्यमातून तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. यात पुढील प्रमुख मागण्या समाविष्ट आहेत:
  • शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करून ७/१२ कोरा करणे
  • ओला दुष्काळ जाहीर करून आपत्तीग्रस्तांना मदत
  • महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४ मागे घेणे
  • बोगस मतदार नोंदणी प्रकरणी कारवाई
  • खतांचा तुटवडा दूर करणे
  • कापूस व सोयाबीन उत्पादकांना विशेष पॅकेज
  • कृषिपंपांना नियमित वीजपुरवठा
  • अतिक्रमणधारकांना पट्टे
  • स्थानिक युवकांना रोजगार
  • निराधार व वृद्धापकाळ पेन्शन वाढवणे
  • महिला बचत गटांना व्याजमाफी
  • जलजीवन मिशन व रस्ते प्रकल्प पूर्ण करणे
काँग्रेसने सरकारला इशारा दिला आहे की, मागण्या मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन उभारले जाईल.
        मोर्चात खासदार प्रभाताई धानोरकर, माजी नगराध्यक्ष व विधानसभा समन्वयक अरुण धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, देविदास सातपुते, कामगार काँग्रेसचे सुरज ठाकरे, सभापती विकास देवाळकर, नानाजी आदे, नंदकिशोर वाढई, माजी नगरसेवक प्रभाकर येरणे, हरजित सिंग संधु, गजानन भटारकर, विलास तुमाने, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, बापू धोटे, सुरेश पावडे, विनोद झाडे, राजु झाडे, सचिन भोयर, शैलेश लोखंडे, विवेक येरणे, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष निर्मला कुडमेथे, शहराध्यक्ष संध्या चांदेकर, कुंदाताई जेनेकर, जिल्हा महासचिव एजाज अहमद, अँड. रामभाऊ देवईकर, तिरुपती इंदूरवार, अनुसूचित जाती विभाग तालुकाध्यक्ष कोमल फुसाटे, अब्दुल जमीर, धनराज चिंचोलकर, युसूफ भाई, रामभाऊ धुमणे, मंगेश गुरनुले, चेतन जयपूर, पुणम गिरसावळे, इंदूबाई निकोडे आदींसह हजारोंच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते, विविध फ्रन्टल संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

#RajuraProtest #FarmersVoice #CongressMarch #ChandrapurNews #FarmersRights #VidarbhaUpdates #PublicRally #JusticeForFarmers #MaharashtraPolitics #RajuraCongress #subhashdhote #arundhote #pratibhadhanorkar #ranjanlande #SurajThackeray #VikasDevalkar #kundataijenekar #gajananbhatarkar #HarjitSinghSandhu #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top