Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पावसाळ्यात जिवती-शेणगांव घाट धोकादायक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पावसाळ्यात जिवती-शेणगांव घाट धोकादायक झुकलेली झाडे तात्काळ तोडावीत - शेतकरी संघटनेची मागणी आमचा विदर्भ - दीपक शर्मा जिवती (दि. २९ ऑगस्ट २०२५...
पावसाळ्यात जिवती-शेणगांव घाट धोकादायक
झुकलेली झाडे तात्काळ तोडावीत - शेतकरी संघटनेची मागणी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
जिवती (दि. २९ ऑगस्ट २०२५) -
        जिवती ते शेणगाव रोडवरील घाट भागात दरड कोसळून मोठे झाड रस्त्यावर पडले असून, या घाटावर दरड कोसळण्याची व झाडे पडण्याची मालिका गेल्या आठवडाभरापासून सुरू आहे. या घटनेमुळे रस्त्यावरून जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळ्यात हा घाट अधिक धोकादायक ठरत असून, प्रशासन याबाबत निष्क्रीय आहे का, हा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.

        काही दिवसांपूर्वी शेतकरी संघटनेचे नेते सुदाम राठोड यांच्या नेतृत्वात वनविभाग जिवती यांना जिवती तालुक्यातील सर्व घाटावरील झुकलेली झाडे तोडून विलेवाट लावण्याबाबत निवेदन देण्यात आले होते. मात्र अद्यापही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना झालेली नाही.

        सुदाम राठोड यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, “जर दोन दिवसांत सर्व घाटावरील झुकलेली झाडे कापून घाट मार्ग मोकळा करण्यात आला नाही, तर शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी आंदोलन करेल.” स्थानिक नागरिक व प्रवाश्यांनी प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन घाटावरील झाडे व दरडी हटवून रस्ता सुरक्षित करावा, अशी मागणी केली आहे.

#JivatiLandslide #RoadSafety #FarmersUnion #TreeFallDanger #PublicSafetyFirst #JivatiGhats #HeavyRainImpact #SaveLivesNotWait #AdministrationAlert #CitizenSafety #shetkarisanghtna #sudamrathod #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top