Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: ‘पंच परिवर्तन’ अंतर्गत पर्यावरण व नागरी कर्तव्यांवर मार्गदर्शन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
‘पंच परिवर्तन’ अंतर्गत पर्यावरण व नागरी कर्तव्यांवर मार्गदर्शन “राजुरा आयटीआयचा सामाजिक जागृतीचा अभिनव उपक्रम” आमचा विदर्भ - अनंता गोखरे राज...
‘पंच परिवर्तन’ अंतर्गत पर्यावरण व नागरी कर्तव्यांवर मार्गदर्शन
“राजुरा आयटीआयचा सामाजिक जागृतीचा अभिनव उपक्रम”
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. ०६ जून २०२५) -
        शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत राज्यभरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) मध्ये "पंच परिवर्तन" या विषयावर विशेष व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. याच उपक्रमांतर्गत राजुरा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पर्यावरण संरक्षण व नागरी कर्तव्य यासारख्या महत्वाच्या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आभासी स्वरूपात झाले. ॲड. मंगल प्रभात लोढा, मंत्री (कौशल्य विकास, म.रा.) यांच्या संकल्पनेतून राज्यभर ‘पंच परिवर्तन’ या विषयाची सखोल मांडणी करण्यात आली.

राजुरा आयटीआयमध्ये झाले विशेष व्याख्यान
        राजुरा आयटीआयमध्ये पर्यावरण संरक्षण या विषयावर नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे राज्याध्यक्ष बादल बेले यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी राबवलेल्या पर्यावरणीय धोरणांवर प्रकाश टाकला आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने स्वच्छता, वृक्षारोपण आणि नैसर्गिक संसाधनांचे रक्षण करण्याचे महत्व पटवून दिले. त्यानंतर, ॲड. राजेंद्र जेनेकर, माजी सचिव, राजुरा तालुका बार असोसिएशन यांनी "नागरी कर्तव्य आणि शिष्टाचार" या विषयावर प्रभावी व्याख्यान दिले. त्यांनी लोकशाही सशक्त करण्यासाठी कायद्याचे पालन, मताधिकाराचा योग्य उपयोग, सार्वजनिक मालमत्तेची जपणूक आणि जागरूक नागरिकत्वाची गरज यावर भर दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य पी.बी. डोंगरवार होते. उद्घाटक म्हणून अरविंद बरूआ, आयआर, दालमिया सिमेंट ग्रुप, प्रमुख अतिथी म्हणून सुधीर रंजन मोहनती (HR हेड, दालमिया सिमेंट), प्रशांत भिमनवार (CSR विभाग) आणि रमेश रोडे (प्र. गटनिदेशक) यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व वृक्ष भेट देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन संतोष शेंडे व शंकर मद्देलवार यांनी केले. प्रास्ताविक रमेश रोडे यांनी तर आभार प्रदर्शन संतोष अवधाते यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top