संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील थकीत रक्कम तातडीने जमा करा – शंतनू धोटे
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. २५ जून २०२५) –
राजुरा तालुक्यातील अनेक गरजू लाभार्थ्यांचे संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना अंतर्गत थकीत हप्ते अद्यापही त्यांच्या खात्यावर जमा झालेले नाहीत. यामुळे लाभार्थ्यांना गंभीर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून त्यांच्यात तीव्र नाराजी आहे. या गंभीर विषयावर चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे यांनी राजुराचे तहसीलदार डॉ. ओमप्रकाश गोंड यांना निवेदन सादर करून तातडीने हप्ते खात्यावर जमा करण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले की, “लाभार्थ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे वेळेवर सादर करूनसुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे, ही बाब अत्यंत खेदजनक आहे. जर हप्ते सात दिवसांत जमा झाले नाहीत, तर आम्ही संबंधित लाभार्थ्यांना घेऊन तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू.”
या निवेदन देते वेळी ओबीसी काँग्रेसचे नंदकिशोर वाढई, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विकास देवाळकर, माजी पंचायत समिती सदस्य तुकाराम माणुसमारे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष इर्शाद शेख, अंकुश परेकर, अंकुश मस्की तसेच युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवक काँग्रेसच्या या पावलामुळे गरजू लाभार्थ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. प्रशासनाने या गंभीर विषयाची तातडीने दखल घेणे आवश्यक आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.