Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गोवरी सेंट्रलच्या सेक्शन-7 अंमलबजावणीसाठी शिवसेनेचे निवेदन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गोवरी सेंट्रलच्या सेक्शन-7 अंमलबजावणीसाठी शिवसेनेचे निवेदन काम बंद आंदोलनाची चेतावणी कामगार नेते बबन उरकुडे यांचे वेकोली प्रशासनास अल्टीमेटम...
गोवरी सेंट्रलच्या सेक्शन-7 अंमलबजावणीसाठी शिवसेनेचे निवेदन
काम बंद आंदोलनाची चेतावणी
कामगार नेते बबन उरकुडे यांचे वेकोली प्रशासनास अल्टीमेटम
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २५ जून २०२५) –
        गोवरी सेंट्रल कोळसा प्रकल्प मागील अनेक महिन्यांपासून रखडला असून, संबंधित कामकाज अद्यापही सेक्शन ४ पुढे सरकलेले नाही. दरम्यान, नव्याने सुरू झालेला गोवरी पोवणी अंमलगन प्रकल्प मात्र सेक्शन ९ पर्यंत पोहोचलेला आहे. या पार्श्वभूमीवर, प्रकल्प प्रभावित शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या प्रकरणी शिवसेना नेते व माजी जिल्हाप्रमुख बबन उरकुडे यांच्या नेतृत्वाखाली, गोवरी सेंट्रल कोळसा प्रकल्प संघर्ष समिती व एचएमएस यूनियन बल्लारपूर एरिया यांच्या संयुक्त विद्यमाने बल्लारपूर येथील मुख्य महाप्रबंधकांना निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदनात सात दिवसांची मुदत देण्यात आली असून, या कालावधीत सेक्शन-7 सुरू न झाल्यास तीव्र रेल्वे सायडींग बंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

        यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये माजी उपजिल्हाप्रमुख (शिवसेना) व एचएमएस यूनियन बल्लारपूर एरिया महामंत्री बबन उरकुडे, शंकर पारखी, उईके, गोयेगावचे उपसरपंच स्नेहल पडवेकर, मारोती चन्ने, अखिल लोनगाडगे, धनंजय सातपुते, साईनाथ लांबट, सूरज गाडवे, अजय गौरकर, शिशिर लांडे, साहिल राखुंडे, मिलिंद लोहे तसेच समस्त गोवरी सेंट्रल प्रकल्पग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकल्पाची प्रगती ठप्प झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान वाढत असून, प्रशासनाने त्वरित निर्णय घेऊन सेक्शन ७ सुरु करावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top