आदिवासींच्या जमीनीवर अनधिकृत उत्खननाचा वाद
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
गडचांदूर (दि. 17 मे 2025) -
राजुरा तालुक्यातील माणिकगढ सिमेंट कंपनीच्या उत्खनन क्षेत्रात आदिवासी कोलाम समाजाच्या जमिनीवर सुरू असलेल्या वादाचा संघर्ष १२ वर्षांपासून अखंड सुरू आहे. वनजमीन आणि महसुली जमिनी बळकावून, रस्ते बंद करून आणि पाण्याचे स्रोत बंद करून कंपनीने आदिवासींवर अन्याय केला आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष आणि कंपनीच्या दबावाखाली आदिवासींच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप होत आहे.
जमीन बळकावली, उत्खनन बेकायदेशीर
वनविभागाने उत्खनन झाल्याचा अहवाल सादर केला असून भूमापन विभागाने सिमांकन नष्ट झाल्याचे नमूद केले आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय तहसीलदारांनी ७/१२ मध्ये कंपनीच्या नावावर नोंद घेतल्याने आदिवासींची जमीन वाया गेली आहे. कुसुंबी येथे शांततेत सुरू असलेल्या आदिवासी आंदोलनावर पोलिसांनी कंपनीच्या तक्रारीवरून सात गुन्हे दाखल केले आहेत. यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
आदिवासींचा आक्रोश
“घराचे छत नाही, शेती नाही, पाणी नाही, रस्ते नाहीत...आता आत्महत्येशिवाय पर्याय नाही,” असे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रपतींना जलसमाधी घेण्याची विनंती करून निवेदन देण्याची तयारी आदिवासींनी दर्शवली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.