Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ''वाघाचा कहर: तीन दिवसांत पाच बळी''
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
''वाघाचा कहर: तीन दिवसांत पाच बळी'' जंगलात तेंदुपत्ता तोडताना वाघाने घेतला महिलेचा जीव आमचा विदर्भ - अनंता गोखरे मूल - चंद्र...
''वाघाचा कहर: तीन दिवसांत पाच बळी''
जंगलात तेंदुपत्ता तोडताना वाघाने घेतला महिलेचा जीव
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
मूल - चंद्रपूर (दि. १३ मे २०२५) -
        तेंदुपत्ता तोडण्यासाठी भादुर्णा येथील बफर झोन क्षेत्रातील जंगलात गेलेल्या महिलेला वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना सोमवारी (दि. १२ मे) सकाळी ७.३० वाजता घडली. या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव भुमेश्वरी दिपक भेंडारे असे आहे. भुमेश्वरी ही मूल तालुक्यातील भादुर्णा येथील रहिवासी असून, तिचा विवाह केवाडा (पेठ) येथील दिपक भेंडारे यांच्याशी झाला होता. काही काळ पतीसोबत राहिल्यानंतर ती आपल्या वडिलांकडे भादुर्णा येथे आली. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पती-पत्नी मिळेल ते काम करीत असताना सोमवारी सकाळी तेंदुपत्ता तोडण्यासाठी ती आई-वडील आणि पतीसह जंगलात गेली होती. तेंदुपत्ता तोडत असतानाच दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला आणि भुमेश्वरीला जागीच ठार केले. आरडाओरड करताच वाघ पळून गेला. घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पोलिस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

वन्यजीवांचा धोकादायक सुळसुळाट:
        भादुर्णा परिसरातील बफर झोन क्षेत्रात वाघांच्या सततच्या हालचालींमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या तीन दिवसांत वाघाच्या हल्ल्यात पाच बळी गेले आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिक प्रशासनाने जंगल क्षेत्रात सतर्कता वाढविण्याची मागणी केली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top