Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: चंद्रपूरच्या इरई नदी खोलीकरणातून निर्माण झालेल्या गादेवरून वाद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चंद्रपूरच्या इरई नदी खोलीकरणातून निर्माण झालेल्या गादेवरून वाद इरई बचाव जनआंदोलनाची चौकशीची मागणी आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स चंद्रपूर (द...
चंद्रपूरच्या इरई नदी खोलीकरणातून निर्माण झालेल्या गादेवरून वाद
इरई बचाव जनआंदोलनाची चौकशीची मागणी
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
चंद्रपूर (दि. १० मे २०२५) -
        चंद्रपूर शहरालगत वाहणाऱ्या इरई नदीच्या खोलीकरणाचे काम जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे. या खोलीकरणात निघणारी गाद (माती) शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता ती गाद शेतकऱ्यांना न देता खासगी ठिकाणी टाकली जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. ‘जर गाद देणार नव्हती तर घोषणा का केली?’ असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

        चंद्रपूर शहरापासून इरई-वर्धा नदी संगमापर्यंत सुमारे १७ किलोमीटर लांबीच्या नदी पात्रात वाढलेली झुडपे आणि गाद काढून नदीचे खोलीकरण व रुंदीकरण केले जात आहे. २५ एप्रिल रोजी पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते या खोलीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला. पहिल्या टप्प्यात राम सेतूपासून चौराला पूलापर्यंतच्या भागात काम सुरू असून आतापर्यंत २०० मीटरपेक्षा अधिक क्षेत्रातून ५६०० ब्रासपेक्षा अधिक गाद काढण्यात आली आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी खासगी प्लॉटमध्ये या गादेचा साठा केल्याची माहिती समोर आली होती, जरी नियमानुसार ती शेतकऱ्यांना देणे आवश्यक आहे. ‘इरई बचाव जनआंदोलन’ संघटनेने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

शेतकऱ्यांना गाद न मिळाल्याची तक्रार:
        या संदर्भात विश्व हिंदू परिषद चे जिल्हाध्यक्ष रोडमल गहलोत यांनी सांगितले की, काही शेतकऱ्यांनी नियमानुसार प्रशासनाला गाद मिळविण्यासाठी अर्ज केले आहेत. मात्र त्यावर कोणतीही कारवाई होत नाही आणि कोणालाही गाद देण्यात येत नाही. काही शेतकरी स्वतःच्या ट्रक, ट्रॅक्टर घेऊन गाद नेण्यासाठी तयार आहेत, तरीही त्यांना गाद मिळत नाही. गहलोत यांनी हे देखील सांगितले की, ज्या पद्धतीने इरई नदी गहराईकरणाचे ढोल पिटले गेले, त्यानुसार प्रत्यक्षात काम नीट होत नाही. पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाकडे बारकाईने लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top