Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सुमठाना फाट्यावर धान भरलेला ट्रक पलटला
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सुमठाना फाट्यावर धान भरलेला ट्रक पलटला रस्ता बंद, वाहतूक ठप्प, प्रवाशांचा खोळंबा आमचा विदर्भ - अनंता गोखरे राजुरा  (दि. २९ मे २०२५) -       ...
सुमठाना फाट्यावर धान भरलेला ट्रक पलटला
रस्ता बंद, वाहतूक ठप्प, प्रवाशांचा खोळंबा
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. २९ मे २०२५) -
        राजुरा-तेलंगणा मार्गावरील सुमठाना फाट्यानजीक गुरुवार, दुपारी सुमारास धानाने भरलेला ट्रक पलटल्याची घटना घडली. या अपघातामुळे काही वेळ मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. विशेषतः अवजड वाहने आणि बससेवेला मोठा फटका बसला. ट्रक पलटल्यानंतर त्यामधील धानाचे पोते रस्त्यावर विखुरले गेले होते. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहतूक अडकून राहिली. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने काही पोती बाजूला करत चारचाकी व दुचाकी वाहनांना मार्गदर्शन केले. त्यामुळे लहान वाहने मार्गक्रमण करू शकली; मात्र अवजड वाहनांसाठी रस्ता काही काळ अडथळाग्रस्त राहिला.
        या अपघातामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला. काही प्रवाशांनी पर्यायी मार्गाचा वापर केला, तर काहींनी दीर्घ प्रतीक्षा करत गंतव्यस्थानी पोहोचण्याचा मार्ग स्वीकारला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेमुळे स्थानिक प्रशासन आणि वाहतूक यंत्रणेची तत्परता व कार्यक्षमता पुन्हा एकदा प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडली आहे. अपघातानंतरची वाहतूक व्यवस्था सावरण्यासाठी यंत्रणांना अधिक तत्पर व सज्ज असण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top