Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पहलगाम हल्ला: राजुरात संतापाची लाट
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पहलगाम हल्ला: राजुरात संतापाची लाट दहशतवाद्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. २४ एप्रिल २०२५) -         ज...
पहलगाम हल्ला: राजुरात संतापाची लाट
दहशतवाद्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २४ एप्रिल २०२५) -
        जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच संतापाचा एक आवाज आज राजुरातूनही उमटला. राजुरा मॉर्निंग ग्रुप, बॅडमिंटन क्लब, व्यापारी असोसिएशन, नेहरू चौक ग्रुप व नागरिकांच्या वतीने आज सकाळी पंचायत समिती चौकात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. हल्ल्याच्या निषेधार्थ आणि दहशतवादाविरोधात घोषणा देत उपस्थित नागरिकांनी "भारत माता की जय" व "जय हिंद" अशा घोषणांनी संविधान चौक परिसर दणाणून टाकला. भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना जहन्नुम पाठविण्यात यावे, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.

        कार्यक्रमानंतर दोन मिनिटे मूक श्रद्धांजली देऊन शहीद पर्यटकाबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. उपस्थितांनी भारत सरकारने अशा दहशतवादी शक्तींना कठोर उत्तर द्यावे व भविष्यात अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी कडक पावले उचलावीत, अशी मागणी केली. यावेळी माजी नगराध्यक्ष विलास बोनगिरवार, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, माजी नगरसेवक घनश्याम हिंगाणे, विनायक कल्लुरवार, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संदीप जैन, दिनकर डोहे, छोटूलाल सोमवलकर, हरभजन सिंग भट्टी, हरजीत सिंग, रवी जामुनकर, अरुण मस्की, बंडू घुंगरे, अॅड. चांदेकर,  मोहन चैनानी, नितीन पिपरे, राधेश्याम सोनी, संतोष पचारे, शंकर झंवर, कोंडावार, सिंग आणि शेकडो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top