Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: रामपुरात भीषण आग
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रामपुरात भीषण आग छत्तीसगढी मजुरांच्या झोपड्या जळून खाक रामपुरातील सरपंच निकिता व शिवसेना (उबाठा) उपतालुकाप्रमुख रमेश झाडे यांनी दिला माणुसकी...
रामपुरात भीषण आग
छत्तीसगढी मजुरांच्या झोपड्या जळून खाक
रामपुरातील सरपंच निकिता व शिवसेना (उबाठा) उपतालुकाप्रमुख रमेश झाडे यांनी दिला माणुसकीचा हाथ
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २४ एप्रिल २०२५) -
        रामपूर येथील कामगार नगर येथे आज दुपारी २ वाजताच्या सुमारास भीषण आग लागून छत्तीसगडमधून आलेल्या कामगारांच्या झोपड्या पूर्णतः भस्मसात झाल्या. या आगीत घरातील सर्व सामान, अन्नधान्य, कपडे, भांडी, कामगारांच्या सायकली आणि सुमारे १२ कोंबड्यांचे देखील नुकसान झाले आहे. दुर्घटना सुमारे दोनच्या सुमारास घडली. कामगार कामासाठी बाहेर गेले असताना ही आग लागली. झोपड्या छबीलाल निषाद, दुलारू निषाद, ललतु निषाद यांच्या होत्या. यामध्ये सुमारे १२ सदस्य राहत होते. सुदैवाने थोड्या अंतरावर असलेली देवल सिंह निषाद यांची झोपडी थोडक्यात बचावली. आग लागण्याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसले तरी, कचरा जाळल्यामुळे ती हवेतून झोपड्यांपर्यंत पोहोचल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेजाऱ्यांनी तात्काळ स्वतःच्या बोरिंग सुरु करून पाण्याच्या पाइपने आग विझवण्याचा प्रयत्न केला व अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवले.
        या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नुकसानग्रस्त कुटुंब सध्या उघड्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर रामपुर ग्रामपंचायतीच्या सरपंच निकिता रमेश झाडे व शिवसेना (उबाठा) उपतालुकाप्रमुख रमेश झाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पीडित कुटुंबियांना अन्नधान्य, तेल, तिखट, मीठ, चादरी, कपडे आणि रोख स्वरूपात मदत देत माणुसकीचे दर्शन घडवले. या वेळी ओमप्रकाश काळे, अशोक सकीनाला, हर्षल निमकर, नितीन साळवे, लांडे पाटील, छोटू मस्के, कातकर पाटील, रंजीत भगत, योगेश गिरी, गोलू गोहले उपस्थित होते. रमेश झाडे यांनी प्रशासनाकडे मागणी केली की, "या कुटुंबांना तातडीने निवारा, अन्नधान्य आणि आवश्यक वस्तूंची पुरवठा करण्यात यावा. दिवसभर राबून कमावलेला सर्वकाही जळून गेला असून सध्या या कुटुंबांचे आयुष्य उघड्यावर आले आहे."

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top