Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: "शेतकरी कर्जमाफी आणि ओबीसी जनगणनेसाठी अखिल कुणबी महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन"
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
"शेतकरी कर्जमाफी आणि ओबीसी जनगणनेसाठी अखिल कुणबी महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन" सामाजिक आणि शैक्षणिक मागण्यांनाही दिला मोठा आ...
"शेतकरी कर्जमाफी आणि ओबीसी जनगणनेसाठी अखिल कुणबी महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन"
सामाजिक आणि शैक्षणिक मागण्यांनाही दिला मोठा आवाज
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
भद्रावती (दि. २३ एप्रिल २०२५) -
        शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी, तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलावीत, या प्रमुख मागण्यांसाठी अखिल कुणबी महासंघाच्या चंद्रपूर जिल्हा शाखेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले. या निवेदनात शेतकरी, ओबीसी व सामान्य जनतेच्या जीवनाशी निगडित अनेक गंभीर मुद्दे मांडण्यात आले आहेत. ओबीसींना शिक्षण, नोकरी, राजकारण व सामाजिक क्षेत्रात प्रतिनिधित्व, शासकीय शाळांचे संरक्षण, रोजगार निर्मिती आणि कुणबी महामंडळाच्या स्थापनेसारख्या विविध मागण्या मांडल्या गेल्या.

        शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, ओबीसींची जातनिहाय जनगणना तात्काळ राबवावी, शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, कुणबी महामंडळाची स्थापना करून समाजाच्या विकासाला चालना द्यावी, शासकीय प्राथमिक शाळा बंद करू नयेत, त्या पूर्ववत सुरु ठेवाव्यात, नॉन-क्रीमीलेयरची अट रद्द करावी, सर्व क्षेत्रांत रोजगारनिर्मितीचे धोरण राबवावे, शिक्षण, नोकरी, राजकारणात आरक्षणाच्या प्रतवारीनुसार योग्य प्रतिनिधित्व द्यावे. अश्या मागण्यांच्या आशयाचे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना अखिल कुणबी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डी. के. आरीकर, जिल्हाध्यक्ष अतुल ठाकरे, उपजिल्हाध्यक्ष अतुल कोल्हे, कार्याध्यक्ष सुधीर कोरडे, देवेंद्र बट्टे, महिला जिल्हाध्यक्ष सौ. विद्या चिताडे, जिल्हा सचिव सौ. वर्षा कालभूत, उपाध्यक्ष संजय फाले, युवा महाराष्ट्र अध्यक्ष आशिष येडांगे, जिल्हा संपर्कप्रमुख नूतन लेडांगे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top