हिरापुरात भीषण आग
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. २४ एप्रिल २०२५) -
हिरापुर गावातील शेतकरी हिबिलाल शेख यांच्या शेतात आज दुपारी सुमारे 2 वाजताच्या सुमारास भीषण आग लागून शेख कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीत त्यांची संपूर्ण बकरीपालनाची व्यवस्था जळून खाक झाली असून, 15 बकऱ्या आगीत होरपळून मृत्युमुखी पडल्या. बकरीपालन हा शेख कुटुंबाचा प्रमुख उपजीविकेचा आधार होता. सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बकऱ्यांच्या भरोशावर संपूर्ण कुटुंबाचे उदरनिर्वाह होत असताना, या घटनेने त्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा धक्का बसला आहे.
आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. गावकऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आग एवढी भयानक होती की सर्व बकऱ्या आगीत होरपळून गेल्या. शेख कुटुंबाला गावकऱ्यांनी धीर देत प्रशासनाकडे तात्काळ नुकसान भरपाईची मागणी केली आहे. शेख यांनी शासनाकडे व प्रशासनाकडे नुकसानभरपाईची मागणी करताना सांगितले की, "आमच्या घराचे चूल फक्त बकऱ्यांमुळे पेटत होती. आता आमच्या डोळ्यासमोर संपूर्ण संसार जळून खाक झाला. शासनाने आम्हाला न्याय द्यावा."
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.