Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: Cattle smuggling गोवंश तस्करी : १६ गोवंशाची सुटका
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Cattle smuggling गोवंश तस्करी : १६ गोवंशाची सुटका तीन आरोपी अटकेत, एक फरार ; १२.४० लाखाचा मुद्देमाल जप्त आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, प्र...
Cattle smuggling गोवंश तस्करी : १६ गोवंशाची सुटका
तीन आरोपी अटकेत, एक फरार ; १२.४० लाखाचा मुद्देमाल जप्त
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, प्रतिनिधी
गडचांदूर (दि. ०१ मार्च २०२५) -
        महाराष्ट्रातून शेजारच्या तेलंगणा राज्यात गोवंशाची तस्करी होत असल्याच्या माहितीच्या आधारे गडचांदूर पोलिसांनी गडचांदूर- पाटण जिवती मार्गावर नाकाबंदी करून दोन वाहनांमधून ३ आरोपींना अटक करून वाहन व गुरासह १२ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले. सदर कारवाई गडचांदूर पोलिसांनी २८ फेब्रुवारी रोजी रात्री ३ वाजता इसापूर बसस्थानकाजवळ केली.

        गडचांदूर पोलीस २७ फेब्रुवारीच्या रात्री गस्त घालत होते. यावेळी गडचांदूर- पाटण जिवती रस्त्यावरून जनावरांची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. त्या आधारे पोलीस पथकाने इसापूर बसस्थानकाजवळ नाकाबंदी लावली. रात्री तीन वाजण्याच्या सुमारास वरझडी गावाकडून पांढऱ्या रंगाची पिकअप येताना दिसली. त्या आधारे पोलिसांनी पिकअप क्रं. एमएच ३४ बीझेड ५६१९ गाडी अडवली. त्याच्या मागे येत अशोक लेलँड क्रं एम एच ३४ बी झेड ७९९४ ला देखील अडवले. मात्र अशोक लेलँडचा चालक अंधाराचा फायदा घेत फरार झाला. पोलिसांनी आरोपी तेलंगणा राज्यातील आसिफाबाद जिल्ह्यातील जैनूर येथील कदीर रजाक शेख (२७) रा. जैनूर जि. असिफाबाद (तेलंगणा), चालक लाल मोहम्मद जैनुद्दीन शेख (३५) आंबेझरी ता. जिवती आणि अमीन शब्बीर शेख (२४) रा. घुग्घुस) यांना अटक केली. जुनेद रशीद शेख, रा. गडचांदूर हा फरार झाला. पोलिसांनी दोन्ही वाहनांच्या ताडपत्री काढून त्यांची झडती घेतली असता पिकअपमध्ये ९ आणि अशोक लेलँड वाहनातील ७ अशा एकूण २ लाख ४० हजार रुपये किमतीच्या १६ गोवंश, चारा व पाण्याची सोय नसताना वाहतूक करत होत्या. चौकशीत आरोपींनी ही जनावरे कत्तलखान्यात नेत असल्याचे सांगितले. या आधारे पोलिसांनी २ लाख ४० हजार रुपये किमतीची गुरे आणि १० लाख रुपये किमतीची दोन वाहने, असा एकूण १२ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केले असून आरोपींविरुद्ध कलम ९, ५ ( ब ), ५ ( अ ) ( १ ), ११, ११(१) (एच), ११(१)(ड) महाराष्ट्र पशुपालन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी हवालदार ज्ञानेश्वर मडावी तपास करत आहेत.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top