चंद्रपूर (दि. २४ नोव्हेंबर २०२४)
बल्लारपूर तालुक्यातील कळमना प्राथमिक आरोग्य केंद्र सुसज्ज इमारत आता फक्त देखावा साठीच आहे की काय असे चित्र दिसून येत आहे. सर्व सामान्य नागरिकांना दिवसां रात्री आरोग्य सेवा देण्यासाठी शासनाने करोडो रुपये खर्च करून सुसज्ज इमारत तयार केली. त्या साठी तज्ञ डॉक्टर व परिचारिका असून त्यांच्यावर लाखो खर्च करण्यात येत आहे, मात्र डॉक्टर व परिचारीका ह्या नेहमी गायब असल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याचे बोलले जात आहे.
कळमना गावातून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने अनेक लहान मोठे अपघात रोजच होत असल्याने रुग्णांना व अपघातग्रस्तांना प्राथमिक उपचारासाठी बल्लारपूर किंवा चंद्रपूर न्यावे लागता आल्यानं अनेकांना जीव गमवावा लागला असल्याचे बोलले जात आहे. दिनांक २४/११/२०२४ रोजी सायंकाळी असाच एक अपघात झाला असता. प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता त्या ठिकाणी एक पण डॉक्टर नसल्याने अपघातग्रस्ताला जीव गमवायची वेळ असल्याने संपूर्ण परिसरात रोष निर्माण झाला असल्याचे बोलले जात आहे. रुग्णांची गैरसोय थांबली नाही तर मोठे आंदोलन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय समोर करू अशी माहिती माजी सैनिक ड्रेफुल आत्राम, जिल्हा अध्यक्ष आदिवासी टायगर सेना चंद्रपूर ह्यांनी दिली.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.