Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: जीवनाच्या कल्याणासाठी भक्तिमार्ग लाभदायक - ह.भ.प. माणिक रोकडे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जैतापूर येथे कार्तिकी एकादशी निमित्य कीर्तन महोत्सव  आमचा विदर्भ - अनंता गोखरे राजुरा (दि. १४ नोव्हेंबर २०२४) -         जैतापूर येथे श्री गु...
जैतापूर येथे कार्तिकी एकादशी निमित्य कीर्तन महोत्सव 
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. १४ नोव्हेंबर २०२४) -
        जैतापूर येथे श्री गुरुदेव दत्त संप्रदाय मंडळाच्या वतीने कार्तिकी एकादशी निमीत्य सद्गुरू नामदेव रोकडे महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ मागील एकोणतीस वर्षापासून दोन दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. (दि. १२) रोज बुधवारला आयोजित गोपाल काल्याच्या कीर्तनात ह.भ.प. सदगुरू माणिक रोकडे महाराज यांनी सांगितले की, भक्तिमार्ग मानवी जीवनाचे कल्याण करणारा मार्ग आहे. आजच्या नवीन पिढीला अध्यात्माचा अभ्यास करीत असताना शास्त्रीय व वैज्ञानिक दाखल्यांचा खुलासा करून देत त्यांना भक्तिमार्ग पटवून देणे आवश्यक आहे. भक्तिमार्गात आलेल्या भक्तांना मुख्य अनुभव येतो तो तणाव मुक्तीचा. ज्याप्रमाणे पंढरपूरच्या वारीमुळं वारकरी किंवा भक्तगण त्यांच्या जीवनातील अडीअडचणी आणि समस्या विसरून जातात पांडुरंगाच्या चरणी तल्लीन होऊन जातात. त्यामुळं त्यांच्यावरील असलेला तणाव हा निघून जातो आणि जगण्यातला पुन्हा एकदा आनंद आणि उत्साह त्यांच्यात संचारला जातो. त्या दृष्टीनं भक्तिमार्ग हा खूप महत्त्वाचा आणि लाभदायक ठरते असे सांगितले. 

        कार्तिकी वारीचं महत्त्व सांगताना ह.भ.प रामचंद्र गोहोकार महाराज सांगतात की, "पांडुरंग परमात्मा स्वतः सांगतात की बाबा तुम्ही शेतकरी आहात, तुम्ही कष्टकरी आहात. आज वारकरी सगळे कष्ट करीत आहे. त्यांनी प्रत्येक वारी करावी अशी अपेक्षा आहे. पण प्रत्येक वारीला सर्वांना त्यांच्या जबाबदाऱ्यांमुळं येता येईल अशी शक्यता नाही. पण पांडुरंग सांगतात 'किमान आषाढी कार्तिकीला विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग'.. हे गुज स्वतः पांडुरंग सांगतात. हा असा देव आहे की कधी कुणाला काही देत नाही आणि कोणाकडून काही घेत नाही याच्याकडे केवळ प्रेमाचा व्यवहार आहे. प्रेम सुख देई, प्रेम देई समाधान. जिथे प्रेमाचं नातं असतं तिथं अपेक्षा नसते आणि जिथे अपेक्षा नसते तिथे अपेक्षाभंग नसतो. म्हणून पांडुरंगाचे भक्त आपल्याला सदैव आनंदी असलेले दिसतात, असे ह.भ.प. गोहोकार महाराज यांनी सांगितलं.

        मागील एकोणतीस वर्षापासून जैतापूर येथिल श्री गुरुदेव दत्त सांप्रदाय मंडळ व जैतापूर ग्रामवसी दोन दिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करीत असते. यात सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक व शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करून कीर्तन महोत्सव मोठ्या उत्साहात पार पाडत आहे. यादवराव तुंबडे यांनी पहाटेची काकड आरती केली. कीर्तन महोत्सवात हार्मोनियम वादक भवन चौधरी, मृदंग वादक समीर वैद्य, भाऊराव चतुरकर, प्रज्वल तूरानकर, गायक वसंता बोबडे, काटवले, डॉ. किरमिरे, गणपत झाडे, प्रेमनाथ पानघाटे, गणपत आवारी याचा सहभाग होता. दहीहंडी दत्त संप्रदायाचे दाता अशोक साखरकर यांनी फोडली. सद्गुरू नामदेव रोकडे यांच्या पालखी सोहळ्यात गडचांदुर, रामपूर, गोवरी, मारडा, एकोडी, जैतापूर येथील दिंड्या व भजन मंडळींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

        या कार्यक्रमाला श्री गुरुदेव दत्त मंडळाचे विलास खारकर, संतोष धांडे, राजू चौधरी, सुनील खारकर, प्रविण थेरे, प्रदीप गोरे, भास्कर फोफरे, शंकर गोरे, साईनाथ आत्राम, सदाशिव फोफरे, मुरलीधर थेरे, सुधाकर गोरे, मनोहर धांडे, ज्ञानेश्वर बेरड, महादेव चौधरी, पुरुषोत्तम गोनेवार, लटारी धांडे, संतोष उरकुंडे, शंकर लोनगाडगे, दौलत धांडे, पुरुषोत्तम निब्रड, साईनाथ फोफरे, मारोती फोफरे, श्रीहरी धांडे, सुनील आत्राम, देवराव धांडे, गणपत मडावी, पवन हनुमंते, वसंता गोनेवार, हरी निब्रड, योगीराज ताजने, प्रफुल थेरे, अशोक खुसपुरे सह जैतापूर ग्रामवासियांनी सहकार्य केले.

#KartikiEkadashi #NamdevRokdeMaharaj #Jaitapur #KirtanMahotsav #GpalKala #ManikRokade #throughdevotion #Bhakta #pandurang #Parmatma #ShriGurudevDuttSampradayaMandal #Rajura #DharmaAadhyatma

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top