Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: ऐसे ''पढ़ेगा'' तो कैसे आगे ''बढेगा'' भारत
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शाळकरी मुलांनी स्कूल बस सुरू करण्यासाठी केली नारेबाजी मुलींना लिफ्ट मागून  जावे लागत आहे  महाविद्यालयात ग्रामस्थांनी आपल्या समस्या सामाजिक क...
शाळकरी मुलांनी स्कूल बस सुरू करण्यासाठी केली नारेबाजी
मुलींना लिफ्ट मागून जावे लागत आहे महाविद्यालयात
ग्रामस्थांनी आपल्या समस्या सामाजिक कार्यकर्ते भूषण यांच्याकडे मांडल्या
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
गडचांदूर (दि. १० ऑकटोबर २०२४) -
        आपला भारत देश जगाची महासत्ता बनायला चालला आहे, स्पेस टेक्नॉलाजी मध्ये आपण अग्रेसर झालो आहोत, नाल्यांच्या गटारा पासून मोफत गॅस योजना, म्हणे दरवर्षी दोन कोटी रोजगार देणार, १५ लाख खात्यावर देणारी योजना १५०० रुपयात गुंडाळली, अश्या थापा देणाऱ्या केंद्र व राज्य सरकार आपल्या गावापासून शिक्षणाकरिता अवघ्या १५ ते २० किमी लांबी वर असलेल्या शाळेत जायला गावातील विद्यार्थ्यांना बस सुद्धा देऊन शकत नाही हि शोकांतिका व वस्तुस्थिती आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूर भोयेगाव मार्गावरील तळोधी (बाखर्डी) येथील विद्यार्थ्यांना शाळेत जायला शाळेच्या वेळेत बसच उपलब्ध नसल्याने शाळकरी मुलांचे विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

        गडचांदूर भोयेगाव मार्गावरील तळोधी (बाखर्डी) येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी गडचांदूर जावे लागते गावात बस येते पण ती सकाळी ११ वाजताच्या नंतर येत असल्याने शाळकरी मुलांना या बसचा काहीही उपयोग नाही. परिणामी शाळकरी विद्यार्थाना लिफ्ट मांगत शाळेत जावे लागत आहे. सदर बाब गावकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांच्या निदर्शनास आणून दिली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सांगितले कि, त्यांना दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, जीप, कार वेळ आल्यास बैलबंडीने सुद्धा लिफ्ट मागून शाळेत जावे लागत आहे, हीच परिस्थिती येताना सुद्धा आहे. एकीकडे देशात व राज्यात महिला असुरक्षतेचा प्रश्न गंभीर असताना जो पर्यंत आपली मुलगी महाविद्यालयातून वा शाळेतून सुखरूप घरी परत येत नाही तो पर्यंत पालकांचा जीव धाकधुकीत राहतो, असे सांगितले. 

        सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांच्या नेतृत्वात बस सुरु करण्यासाठी शाळकरी मुलांसोबत गावातील महिलांनी सुद्धा नारेबाजी करत '''भूषण फुसे' यांच्या माध्यमातून राजुरा आगार व्यवस्थापक याना निवेदनही देण्यात आले. तात्काळ बस सुरु न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा  सामाजिक कार्यकर्ता भूषण फुसे यांनी दिला आहे.


#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #Socialworker #BhushanPhuse #BhushanFuse #BhushanMadhukarraoFuse #kukudsath #pandharpouni #Talodhi #Bakhardi #GadchandurBhoyegaonMarga

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top