Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: धारिवाल कंपनीचा कंत्राटी कामगारांचा पगारात 13 टक्क्यांनी वाढ
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचनेप्रमाणे डॉ.मंगेश गुलवाडे यांनी घेतला होता पुढाकार  भारतीय जनता पक्षाच्या मध्यस्थीने संपाची यशस्वी सांगता आमचा ...
सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचनेप्रमाणे डॉ.मंगेश गुलवाडे यांनी घेतला होता पुढाकार 
भारतीय जनता पक्षाच्या मध्यस्थीने संपाची यशस्वी सांगता
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. 03 ऑक्टॉबर 2024) -
           धारिवाल कंपनीच्या कंत्राटी कामगारांचा मागील 24 सप्टेंबरपासून सुरू असलेला संपाची यशस्वीरीत्या सांगता झाली. भारतीय जनता पक्षाच्या हस्तक्षेपाने आणि डॉक्टर मंगेश गुलवाडे यांच्या प्रयत्नाने तसेच विशाल निंबाळकर, भारतीय मजदूर संघाचे हेमराज गेडे, राकेश बोमनवार, प्रवीण उरकुडे, अमित निरंजने, पवन ढवळे, रामकुमार आकापल्लीवार यांच्या वाटाघाटींमुळे कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असून त्यांच्या पगारात 13 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरपना शाळकरी मुलीवर अत्याचार प्रकरण ; सोशल मीडिया वर निषेध काय करता हिम्मत असेल तर त्याला ठेचा - भूषण फुसे

        कामगारांच्या संपामुळे निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती सोडवण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मंगेश गुलवाडे आणि विशाल निंबाळकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या प्रयत्नांमुळे कंपनी व्यवस्थापन आणि कंत्राटी कामगारांमध्ये समन्वय साधण्यात आला व कामगारांनी आपला संप मागे घेतला.

        संप मिटल्याने धारिवाल कंपनीच्या कामकाजात नियमितपणा परत आला असून सर्व कामगारांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. शंकर खंडारकर, सुरज गादेवार आणि विशाल मेश्राम या कामगार प्रतिनिधींनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि वाटाघाटी करणाऱ्या सर्व नेत्यांचे आभार मानले आहेत.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari  #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #DrMangeshGulwade #MangeshGulwade #SudhirMungantiwar #DhariwalCompany #BhartiyJantaParty #BJP #Contractworkers #strike #CompanyManagement #Laborrepresentatives

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top