राजुरा (दि. २९ सप्टेंबर २०२४) -
आयटीआय चे महासंचालक यांनी विद्यार्थ्यांचे निकाल १५ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी १० वाजता जाहीर केला. मात्र तत्पूर्वी दिनांक १३ सप्टेंबर २०२४ ही पॉलटेक्निक प्रवेशाची अंतिम तारीख होती. त्यामुळे राज्यातील हजारो आयटीआय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती. दरम्यान ही बाब आमदार सुभाष धोटे यांच्या लक्षात येताच त्यांनी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आणि संचालक यांच्याशी संपर्क साधून सदर पॉलटेक्निक प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढवून आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात यावी अशी मागणी केली.
अखेर राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव आणि संचालक यांनी सदर गंभीर बाब लक्षात घेऊन आमदार सुभाष धोटे यांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन पॉलटेक्निक प्रवेश प्रक्रियेची मुदत वाढवीली. यामुळे राज्यातील हजारो आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पॉलटेक्निक प्रवेशाची संधी मिळाली असून आ. सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने राज्यातील हजारो आयटीआय विद्यार्थी पाँलीटेकनीक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सामील झालेत त्यांचे शैक्षणिक नुकसान टळले आहे.
#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #rajura #ballarpur #korpana #gadchandur #gondpipari #ballarshah #chimur #bhadravati #warora #nandaphata #kavthala #JivatiTaluka #Mul #SubhashDhote #PolytechnicAdmission #Admissionprocess #ITIpassedstudents #students
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.