Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: लोकसभेच्या निवडणूकीत 'त्या' अभद्र युतीची चर्चा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीचा बदला शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते घेतील काय? आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. १६ एप्रिल २०२४) -   ...

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीचा बदला शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते घेतील काय?
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १६ एप्रिल २०२४) -
        १८व्या लोकसभेच्या पहिल्या टप्याच्या निवडणूकीचा प्रचार येत्या काही तासात संपणार नाही. यंदाच्या निवडणूकीत कोण येणार? कुणाची सरशी आहे? यावर चौका-चौकात चर्चा सुरू आहे. या निवडणूकीत सर्वसामान्यांच्या हातात, मोबाईल आल्यांने, कुणापासून काहीही लपून राहत नाही. त्यामुळे असलेल्या माहीतीची चर्चा या निवडणूकीच्या माध्यमातून होत आहे. राजूरा विधानसभेत कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या अभद्र युतीची चर्चा आता उघडपणे केली जात असून, त्या निवडणूकीत काँग्रेस ने शेतकरी संघटनेला दिलेली अस्पृष्यतेची वागणूकीचा बदला घेण्यांची संधी शेतकऱ्यांना मिळाल्याची चर्चा आहे.

        कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत वामनराव चटप यांना सत्ता मिळून त्यांची ताकद वाढू नये याकरीता काँग्रेसने त्यांचे कट्टर विरोधक भाजपा सोबत हातमिळवणी केली होती. सत्तेत येण्याकरीता, भाजपावर तुटून पडणारे कट्टर काँग्रेसी नेतेही या निवडणूकीत विजयाकरीता भाजपा सोबतच्या युतीत सहभागी झाले होते. शेतकरी संघटनेला काँग्रेस सोबत जायचे होते, तसा प्रस्तावही चटप समर्थकांकडून गेला असल्याची माहिती आहे.  मात्र चटप सत्तेत आल्यास, विधानसभेत आपल्याला 'जड' जाईल अशी भिती काँग्रेसला वाटल्यांने, त्यांनी शेतकरी संघटनेचा प्रस्ताव धुळकावित, भाजपासोबत घरोबा केला. या अभद्र आणि अनैसर्गीक युतीवरून त्यावेळी प्रचंड नाराजी निर्माण झाली होती.

         कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीचा बदला शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते घेतील काय अशी चर्चा जोर धरू लागली आहे. वामनराव चटप यांनीही, काँग्रेस नंबर एक शत्रु तर भाजपा हा दोन नंबरचा शत्रु असे जाहीर सांगत आपला पाठींबा अप्रत्यक्ष कुणाकडे? याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. (aamcha vidarbha) (vidarbha) (Chandrapur-vani-aarni loksabha shetra) (chandrapur) (rajura)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top