आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 27 सप्टेंबर 2023) -
जिवती तालुक्यातील सोयाबीन पिकाचे नुकसान होऊन हाती आलेले पीक नष्ट झाले आहे. त्यातही पांढरी माशी, मोजक आणि खोंडळी लागल्यामुळे सोयाबीनचे पीक पूर्णतः नष्ट असून त्यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी आणि सुलतानी संकट आले आहे. जिवती तालुक्यातील शेतकरी हा हताश झाला असून हाती आलेले पीक गेल्यामुळे चिंतेत आहे. शेतकऱ्यांच्या समस्या राज्याचे मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका रुपयात विमा काढलेला आहे. शेतकऱ्यांना विमा कंपनीने लाभ द्यावा व ज्यांनी विमा काढलेला नाही त्यांना एकरी 50 हजार रुपये अनुदान देण्यात द्यावे या आशयाचे निवेदन तहसीलदार जिवती यांना शिवसेनेच्या वतीने देण्यात आले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख भरत बिरादार, शिवसेना तालुका संघटक गणेश पवार, मुनजाजी बर्वे, कपिल राठोड, चंद्रकांत पुकट्वाड, राजू कुमारे, अरुण भोगे, जालीम कोडपे उपस्थित होते (jiwati) (aamcha vidarbha)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.