Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: श्री दत्त व श्री साईं मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गुरु: साक्षात् परब्रह्म! श्री दत्त व श्री साईं मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत प्रतिनिधी गडचांदूर (दि. ४ जुल...
गुरु: साक्षात् परब्रह्म!
श्री दत्त व श्री साईं मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत प्रतिनिधी
गडचांदूर (दि. ४ जुलै २०२३) -
        दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. (Guru Purnima 2023) गुरु शिवाय ज्ञान नाही, ज्ञाना शिवाय आत्मा नाही, ध्यान, ज्ञान, संयम आणि कर्म ही सर्व गुरुची देणगी. आपल्या जीवनात गुरुचे स्थान हे सर्वात महत्त्वाचं स्थान समजलं जातं. एखाद्या मातीच्या गोळ्याला आकार द्यावा अशा पद्धतीने गुरु आपल्या विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे गुरुचे आभार मानण्यासाठी म्हणून भारतात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते. महाभारत या महाकाव्याचे निर्माते असलेल्या व्यास ऋषींच्या कार्याच्या स्मरणात भारतात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. (Gadchandur)

        गडचांदूरात गुरुपौर्णिमा व आषाढी उत्सव सण २००८ पासून साजरा करण्यात येत आहे. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत दि. ३ जुलै रोजी साईराम उत्सव समिती श्री दत्त मंदिर मंडळ गडचांदूर यांच्या मार्फत श्री साईं मंदिर श्री दत्त मंदिर येथे श्री साईंराम, श्री दत्तगुरु चे अभिषेक करून नित्य नियमाने पूजा अर्चना करण्यात आली. सायंकाळी भजन व कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यानंतर लगेच महाप्रसादाचा कार्यक्रमाला सुरुवात झाली. शेकडो नागरिकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी नप उपाध्यक्ष शरद जोगी, नगरसेवक सागर ठाकुरवार, महादेव एकरे, रमेश काकडे, विनोद तराडे, गणेश सातपाडे, गौरव बंडीवार, किटू जयस्वाल, नण्या पाचभाई, गणेश चापले, शंकर क्षीरसागर, आशीष शेरकी, निखिल ठेंगणे, प्रशांत पात्रे, आशुतोष नागोसे, सुधीर पिंपळकर, सुनील झाडे, रुपेश चुदरी, रोहित शिंगाडे, रोहन काकडे, मंदिर महाराज उपाध्ये, कैलाश कुइटे, संजय पांडे, संदीप धनविजय, विठ्ठल डाखरे, अनिल पिंपळकर, दशरथ मारलुन, राजकुमार रोहने, शिवा साळवे, शिवाजी साबळे, विकी घोरे, अनिल ठाणेकर, दीपक वरभे, संतोष बुतले प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता साईंराम उत्सव समिती दत्त मंदिर गडचांदूर येथील कार्यकर्त्यांनी, नागरिकांनी परिश्रम घेतले. (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top