Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: उंटाला घाबरून बैलांचे पाय तुटले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
ऐन हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान आमचा विदर्भ - अनंता गोखरे द्वारे राजुरा (दि. ४ जून २०२३) -         शनिवार दि. ०३ जून २०२३ रोजी सायंकाळच्या सुम...

ऐन हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान
आमचा विदर्भ - अनंता गोखरे द्वारे
राजुरा (दि. ४ जून २०२३) -
        शनिवार दि. ०३ जून २०२३ रोजी सायंकाळच्या सुमारास मौजा सिंधी येथील संजय वामनराव ढुमणे यांच्या शेतामध्ये त्यांचा सालगळी शेती हंगामा करिता वखरणी करीत असताना शेड्या मेंढ्या सोबत उंट घेऊन आपल्या भागात चाऱ्यासाठी आलेल्या पैकी एका व्यक्तीने उंटाला चारायला वखरणी चालू असलेल्या शेतात घेऊन आला. तेव्हाच वखरणी करणाऱ्यांने त्याला दोन तीन वेळा सांगितले की वखरणी चालू आहे. तुझ्या उंटाला बैल जर घाबरले तर नुकसान होईल तु उंटाला घेऊन दुसरीकडे जा तरी त्याने मुजोरीने तिथेच उंटाला चारत होता. तेवढ्यात वखरणी चे बैल घाबरून सैरावैरा आऊताला घेऊन पळू लागले आणि त्या पैकी एका बैलांचा पाय तुटून दुखापत झाली. उंट वाल्यांच्या मुजोरी मुळेच ऐन हंगामाच्या वेळी ७००००/- रुपये किमतीच्या बैलाचे नुकसान झाले असल्याने संबंधित उंट मालकाने नुकसान झालेल्या बैल मालकाला नुकसान भरपाई द्यावी आणि शेतीचे हंगाम सुरू होत असल्याने मेंढपाळ्यांना शेत शिवारात उंट, मेंढ्या चराईस मनाई करण्यात यावी अशी मागणी उपसरपंच रामभाऊ ढुमणे आणि परिसरातील शेतकरी यांच्या कडून प्रशासनाला करण्यात आली आहे. (Losses to farmers during the rainy season) (rajura) (aamcha vidarbha)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top