Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: लग्न समारंभ आटोपून घरी परत असताना अंगावर वीज कोसळली
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
दोन चिमुकल्याण सह एकाच कुटुंबातील चौघांच्या दुर्दैवी मृत्यू आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स देसाईगंज (दि. २४ एप्रिल २०२३) -         अवकाळी पा...
दोन चिमुकल्याण सह एकाच कुटुंबातील चौघांच्या दुर्दैवी मृत्यू
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
देसाईगंज (दि. २४ एप्रिल २०२३) -
        अवकाळी पावसाने स्वतःचा बचाव करण्यासाठी झाडाखाली थांबलेल्या कुटुंबावर वीज पडून दोन चिमुकल्यासह पती-पत्नीच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सरवाडीतील लग्न समारंभ आटोपून एकाच कुटुंबातील चौघे जण परतत होते. यावेळी अवकाळी अचानक मेघगर्जनेसह पाऊस सुरू झाला सोबत दोन चिमुकल्या असल्याने दुचाकी उभी करून चौघे झाडाखाली थांबले होते. (Unfortunate death of four of the same family including two small children) (desaiganj)

        यावेळी अचानक झाडावर वीज कोसळल्याने झाडाखाली थांबलेल्या चौघांच्याही जागी जागीच मृत्यू झाला. हृदय हेलावणारी ही घटना तालुक्यातील कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील तुळशी फाटा येथे आज सायंकाळी पावणे सहा वाजताच्या दरम्यान घडली. बाली भारत राजगडे वय २ वर्षे, देवांशी भारत राजगडे वय ४ वर्षे, अंकिता भारत राजगडे वय 29 वर्षे व भारत राजगड वय 35 वर्षे रा. आमगाव बुट्टी तालुका देसाईगंज या चौघांच्या घटनेत मृत्यू झाला. 

        भारत राजगडे यांची गळगला (तालुका कुरखेडा) ही सासुरवाडी आहे सासुरवाडीत नातेवाईकाच्या लग्नात लग्न समारंभासाठी तीन दिवसापासून भारत राजगडे पत्नी व दोन मुलीसह गेले होते. आज 24 एप्रिल ला लग्न समारंभ आटोपल्यानंतर ते दुचाकीवरून कुटुंबासह परत गावी जाण्यास निघाले असता कुरखेडा देसाईगंज मार्गावरील तुळशी फाटा येथे अचानक पाऊस सुरू झाला. 

        वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाट होऊ लागल्याने रस्त्यालगत दुचाकी उभी करून ते झाडाच्या बुंध्याला थांबले तेवढ्याच वीज झाडावर कोसळली. यामुले चौघांच्याही दुर्दैवी मृत्यू झाला. या घटने संपूर्ण कुटुंब उद्धव झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे आमगाव बुट्टी गावावर शोककडा पसरली असून माहिती मिळताच महसूल व पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top