Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गोवरी परिसराला गारपिटीचा तडाखा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कापूस पिकांसह रब्बीतील गहू, तूर, हरभरा, ज्वारी पिके उध्वस्त हातातोंडाशी आलेला घास हिरावला आमचा विदर्भ - विरेंद्र पुणेकर तालुका प्रतिनिधी राज...
कापूस पिकांसह रब्बीतील गहू, तूर, हरभरा, ज्वारी पिके उध्वस्त
हातातोंडाशी आलेला घास हिरावला
आमचा विदर्भ - विरेंद्र पुणेकर तालुका प्रतिनिधी
राजुरा (दि. २० मार्च २०२३) -
        गोवरी परिसरात रविवारी सायं.४.३० वाजताच्या सुमारास गारपिटीने खरीपासह रब्बी हंगामातील पीके पूर्णतः भुईसपाट झाली. कापूस, तूर हरभरा,गहू,ज्वारी पीक जागेवरच मातीमोल झाल्याने शेतकरी हतबल झाला.दोन दिवस पाऊस पडल्यानंतर गोवरी परिसरातील गोयेगाव, अंतरगाव, खामोना,अहेरी,पाचगाव परिसरातील गावात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. गोवरी परिसरात बोरासारख्या गारा पडल्याने तसेच कापणी करून ठेवलेले पीक भुईसपाट झाले. पिकाला कोंब अंकुरण्याची स्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरवल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट उभे ठाकले आहे. परतीच्या पावसाने रब्बी हंगामातील पीक पूर्णतः आडवे पडले आहे.पावसामुळे पूर्ण पीक उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत वाया गेली आहे.त्यामुळे शेतकरी काकुळतीला आला आहे.

        राजुरा तालुक्यासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात परतीच्या  अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने हाती येणारे कापूस, तूर,गहू, ज्वारी, हरभरा पिकांना पावसाचा जबर तडाखा बसला. गोवरी परिसरात गारपीट झाली. गोवरी, माथरा, गोयेगाव, अंतरगाव, आर्वी, खामोणा, चंदनवाही, पाचगाव परिसरात गारपिटीने व पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला गेला आहे. खरिपातील पिकांनी शेतकऱ्यांना दगा दिला. परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने पिके पूर्णतः उध्वस्त झाली आहे. काही शेतकऱ्यांनी तूर पीक कापणी केली आहे.परंतु अवकाळी गारपीट व पावसाने होत्याचे नव्हते झाले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top