Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: लोकशाहीची पायमल्ली, हुकूमशाही कडे वाटचाल : आमदार सुभाष धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राहुल गांधींची खासदारकी रद्द प्रकरणी प्रतिक्रिया आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी  राजुरा (दि. २४ मार्च २०२३) -         सुरत खटल...
राहुल गांधींची खासदारकी रद्द प्रकरणी प्रतिक्रिया
आमचा विदर्भ - अनंता गोखरे कार्यालय प्रतिनिधी 
राजुरा (दि. २४ मार्च २०२३) -
        सुरत खटल्यातील प्रकरणात न्यायालयाने 30 दिवसाचा अवधी देऊन देखील, आता राहुल गांधी यांच्यावर लोकसभा सचिवालयाकडून अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेने मोदी सरकार धास्तावले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव दिसत आहे. याच भीतीतून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याची कारवाई केली आहे .ही लोकशाहीची पायमल्ली असून हुकूमशाहीकडे वाटचाल आहे. अशी प्रतिक्रिया राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यांनी दिली. (Rahul Gandi) (Subhash Dhote)

        अदानी प्रकरणावर मोदी सरकार अडचणीत आले आहे. अदाणी प्रकरणात विरोधकांनी सभागृहात बोलू नये यासाठी भाजपने सूडबुद्धीचे राजकारण केले आहे. सीबीआय, इडी सारख्या संस्थांच्या माध्यमातून विरोधकांना वेटीस धरले आहे हे सुदृढ लोकशाहीसाठी मारक आहे. अशीही प्रतिक्रिया आमदार सुभाष धोटे यांनी दिली. (Rahul Gandhi's reaction to the cancellation of MP)

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top