Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: गडचांदूरच्या "त्या" तीन चौकात वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नगराध्यक्ष सविता टेकाम व शिष्टमंडळाने दिले ठाणेदाराना निवेदन आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी गडचांदूर (दि. १९ मार्च २०२३) -...
नगराध्यक्ष सविता टेकाम व शिष्टमंडळाने दिले ठाणेदाराना निवेदन
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत, तालुका प्रतिनिधी
गडचांदूर (दि. १९ मार्च २०२३) -
        शहरातील अनेक शाळां व महाविद्यालय मधील विद्यार्थी सध्या दररोज नव्या आव्हानाला तोंड देत आहेत. बेशिस्त वाहनचालकांच्या वेगावर आळा घालण्याकरिता तसेच प्रशासनाने बहुतांश शाळांसमोर ‘पुढे शाळा आहे’ अशा आशयाचे फलक लावल्यानंतरही वाहनचालक तीव्र गतीने वाहने चालवितात परिणामी आपले शिक्षण घेणारे मुलं-मुली  घरी येईपर्यंत पालकांचाही जिव टांगणीला लागलेला असतो. (Mayor Savita Tekam and the delegation gave a statement to Thanedar) (Gadchandur) (Savita Tekam)

        शहरातील शहीद बाबुराव पुल्लेसुर शेडमाके चौक, महात्मा गांधी चौक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वाहनांची खुप वरदळ असते. या चौकातून शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी ये-जा करीत असतात. बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघात होण्याची शक्यता नेहमी असते याबाबतची तक्रार शहरातील नागरिक नगराध्यक्ष सौ. सविता टेकाम यांचेकडे घेऊन येत होते. नागरिकांची मागणी लक्षात घेता नगराध्यक्ष सौ. सविता टेकाम, बांधकाम सभापती सौ. मीनाक्षी एकरे, महिला बालकल्याण सभापती सौ. जयश्री ताकसांडे, नगरसेविका सौ. कल्पना निमजे यांच्या शिष्टमंडळाने या तिन्ही चौकात वाहतूक पोलीस नेमण्याच्या मागणीचे निवेदन ठाणेदाराने दिली. यावेळी शहरातील अनेक महिलाही उपस्थित होत्या. 

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top